शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपुरातील राणे कुटुंब मृत्यू प्रकरण; चौघांना संपवण्याचे आक्रित कुणी घडविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 10:52 IST

नागपूरसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कोराडीतील राणे कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूमागचे कारण अधिकृतपणे उघड झालेले नाही.

ठळक मुद्दे डॉक्टर सुषमाकडे संशयाची सुई

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख असलेले धीरज दिगंबर राणे (वय ४२) प्रचंड तणावात होते, पुरते खचले होते. त्यांची ही अवस्था पाहवली जात नसल्यामुळे डॉक्टर पत्नीने आक्रित घडवून तणावातून सर्वांचीच कायमची सुटका करून घेतल्याचा अंदाजवजा संशय आहे. धीरज, ध्रुव आणि वन्या या तिघांच्या मृतदेहाशेजारी आढळलेल्या रिकाम्या इंजेक्शनमुळे हा संशय घट्ट होतो, असे खास सूत्रांचे मत आहे.नागपूरसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कोराडीतील राणे कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूमागचे कारण अधिकृतपणे उघड झालेले नाही. मात्र, आढळून आलेल्या सुसाईड नोटमधून काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेमागचे काही पैलू उघड झाले आहेत. त्यातून काही नाजूक पैलू या घटनेशी जुळले असावे, अशीही कुजबुज सुरू झाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस यावर उघडपणे बोलतील. मात्र सुसाईड नोटचा मजकूर लक्षात घेतल्यास सुषमा यांनीच हे आक्रित घडवून आणले, अशी शंका घेण्यास वाव असल्याचे संबंधित सूत्रांचे मत आहे.

सुसाईड नोटमध्ये पती धीरज यांना उद्देशून सुषमा यांनी प्रारंभीच माफी मागितली आहे. ते प्रचंड तणावात होते, ते मानसिकरीत्या खचले होते. त्यांचे ते रोज रोज मरण बघवले जात नव्हते, म्हणून सुषमा यांनी चौघांनाही संपवण्याचा निर्णय घेतल्याचा सुसाईड नोटमध्ये मजकूर आहे. धीरज कशामुळे खचले होते, ते मात्र त्यात नमूद नाही. तुमच्या(धीरज)शिवाय तिघांच्या जगण्याला अर्थ नसल्याचाही सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. मराठीत लिहून असलेल्या या सुसाईड नोटमधील आशय धीरज आणि सुषमा यांच्यातील जिव्हाळा आणि ताणतणाव असे दोन्ही पैलू उघड करणारा आहे.

अक्षरतज्ज्ञांकडून शहानिशाती चिठ्ठीवजा सुसाईड नोट सुषमा यांनी लिहून ठेवली, असा भास होत असला तरी ती खरोखर त्यांनीच लिहून ठेवली का, त्यांचेच ते अक्षर आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस हॅन्ड रायटिंग एक्सपर्ट अक्षरतज्ज्ञ यांची मदत घेणार आहेतसुसाईड नोट आणि खालील काही मुद्दे या प्रकरणात सुषमा यांनाच दोषी ठरवितात, असे संबंधित अधिकारी सांगतात.सुषमा डॉक्टर असल्याने धीरज, ध्रुव आणि वन्या यांना कोणते इंजेक्शन घेतल्याने काय होते, त्याची कल्पना असावी. डॉक्टर असल्याने त्याच इंजेक्शन देऊ शकतात.

तिघांची कोणतीही हालचाल अथवा आवाज सकाळपासून त्यांच्या घरात ऐकू आला नाही. परंतु सुषमा आज दुपारी १ वाजेपर्यंत जिवंत होत्या.पोलिसांना सुषमा यांचे पती, मुले वेगळ्या रूममध्ये वेगळ्या अवस्थेत तर सुषमा गळफास लावून आढळल्या. सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुषमा दोनवेळा प्रमिला यांच्याशी बोलल्या, असे प्रमिला यांनी पोलिसांना सांगितले आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या