शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राणे दिवाळीनंतरच विदर्भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:07 IST

काँग्रेसला रामराम ठोकत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नागपूर-विदर्भ दौरा लांबण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसमर्थकांकडून घेताहेत माहिती : मंत्रिमंडळातील सहभागानंतर रणनीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसला रामराम ठोकत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नागपूर-विदर्भ दौरा लांबण्याची चिन्हे आहेत. राणे आता आता दिवाळीनंतरच विदर्भाच्या दौºयावर येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील समर्थकांकडून माहिती घेतली जात आहे. मंत्रिमंडळातील सहभागानंतर राणे विदर्भात चाचपणीसाठी सक्रिय होतील, असे समर्थकांचे म्हणणे आहे.राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. त्या वेळी नागपुरातून आपण राज्याचा दौरा करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, नवरात्रीत राणेंचा विदर्भ दौरा झालाच नाही. दसºयाच्या दुसºया दिवशी राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर राणे ८ आॅक्टोबर रोजी नागपुरात येतील, अशी चर्चा होती. नंतर ही तारीख वाढून १६ झाल्याचेही कार्यकर्त्यांना कळविण्यात आले. मात्र, ताज्या निरोपानुसार राणे दिवाळीनंतरच विदर्भात पाऊल ठेवणार आहेत.या दोन आठवड्यात विदर्भातील समर्थकांना जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या पक्षाचे विदर्भातील पदार्पण धडाक्यात व्हायला हवे, यासाठी राणे गोटाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून कितपत पाठिंबा मिळेल, कोण कोण ‘स्वाभिमान’मध्ये येतील याचा आढावा घेतला जात आहे. ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’ माहीत करूनच विदर्भातील कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करणाºया नागपूर व विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळेल, अशी राणेंना अपेक्षा असावी. मात्र, तसे झाले नाही. चव्हाणांच्या कार्यशैलीची दिल्लीत तक्रार करणाºयांपैकी एकही नेता राणेंच्या समर्थनार्थ समोर आलेला नाही. त्यामुळे नागपुरात राणेंच्या गळाला काहीच लागले नसल्याचे चित्र आहे. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय हिवरकर यांनी राणे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला होता. दुसरे कुणी मोठे समर्थक अद्याप समोर आलेले नाहीत.भाजपामध्ये न गेल्याने अनेकांची माघारराणे हे वेगळा पक्ष न काढता भाजपामध्ये गेले असते तर हे निमित्त साधत अनेकांनी भाजपामध्ये एन्ट्री करण्याचा बेत आखला होता. मात्र, राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करताच पडद्यामागील समर्थक माघारी परतले आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण ‘स्वाभिमान’मध्ये येऊ शकत नाही, अशी भूमिका काही समर्थकांनी घेतली आहे.