शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रामटेक तालुक्यात सरासरी २७ मिमी पावसाची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सलग १४ दिवसानंतर रामटेक तालुक्यात बुधवारी (दि. २१) सरासरी २७ मिमी पाऊस काेसळला. महसूल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सलग १४ दिवसानंतर रामटेक तालुक्यात बुधवारी (दि. २१) सरासरी २७ मिमी पाऊस काेसळला. महसूल विभागाच्या नगरधन मंडळात सर्वाधिक तर देवलापार मंडळात सर्वात कमी पावसाची नाेंद करण्यात आली. गुरुवारी (दि. २२) दिवसभर ढगाळ वातावरण असूनही फारसा पाऊस बरसला नाही. मध्यम स्वरुपाच्या या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला सुरुवात केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात आजवर तालुक्यात ३९४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी २७ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. यात रामटेक मंडळात २६ मिमी (आजवर एकूण ४४५ मिमी), देवलापार मंडळात २० मिमी (एकूण ३०५ मिमी), नगरधन मंडळात ३२ मिमी (एकूण ४७८ मिमी) आणि मुसेवाडी मंडळात ३० मिमी (एकूण ४१६) मिमी पाऊस काेसळला. देवलापार मंडळात घनदाट जंगल असूनही त्या भागात सर्वात कमी पाऊस काेसळला.

तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. पावसाने दडी मारल्याने धानाच्या राेवणीची कामे थांबली हाेती. मात्र, बुधवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला वेग दिला आहे. त्यातच पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी जलाशयातील पाणी कालव्यात साेडले जात असल्याने राेवणीचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. या जलाशयातून डाव्या कालव्यात १,८०० क्यूसेक तर उजव्या कालव्यात १६० क्यूसेक पाणी १० जुलैपासून साेडले जात असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू भोमले यांनी दिली. धानाच्या राेवणीला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांनाही कामे मिळाली आहेत.

...

खिंडसी जलाशयात चार टक्के पाणीवाढ

बुधवारी काेसळलेल्या पावसामुळे रामटेक शहरानजीकच्या खिंडसी जलाशयात चार टक्क्यांनी पाण्याची वाढ झाली आहे. पारशिवनी तालुक्यातील पेच नदीवरील नवेगाव खैरी व रामटेक तालुक्यातील ताेतलाडाेह जलाशयातील पाणीसाठ्यात मात्र वाढ झाली नाही. मध्य प्रदेशातील चाैराई धरणातील पाणी साेडल्यानंतर या दाेन्ही जलाशयातील पाण्यात वाढ हाेते. या दाेन्ही जलाशयांमध्ये मागील वर्षी याच काळात सरासरी ७६ टक्के साठा हाेता. खिंडसी जलाशयात ३० टक्के (३१ दलघमी), नवेगाव खैरी जलाशयात ६४.८० (९२ दलघमी) आणि तोतलाडोह जलाशयात ५९.३९ टक्के (६०३ दलघमी) पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता राजू भोमले यांनी दिली.