शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक तालुक्याला ६५२०.५ क्विंटल बियाण्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील एकूण २८,११६ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी केली जाणार असून, त्यासाठी एकूण ६५२०.५ क्विंटल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील एकूण २८,११६ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी केली जाणार असून, त्यासाठी एकूण ६५२०.५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी खरीप पीक आढावा बैठकीत दिली. धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेक तालुक्यातील साेयाबीनचे पीक हद्दपार झाल्यागत आहे तर कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचेही आकडेवारीवरून लक्षात येते.

तालुक्यातील शेतकरी टिपीव, फाेकीव, पेरीव व राेवणी या चार पद्धतीने धानाची पेरणी करतात. यावर्षी २१,५०० हेक्टरमध्ये धानाच्या राेवणीचे नियाेजन करण्यात आले असून, यात १५८ हेक्टरमध्ये टिपीव, १०३ हेक्टरमध्ये फाेकीव, १०३ हेक्टरमध्ये पेरीव तर उर्वरित २०८०२.९५ हेक्टरमध्ये राेवणी करून धानाचे पीक घेतले जाणार असल्याचे स्वप्निल माने यांनी स्पष्ट केले. धानाच्या पिकाला एकरी २० हजार रुपये खर्च येत असून, तुलनेत भाव कमी मिळत असल्याने धानाचे पीक परवडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

तालुक्यात ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी, २,१०० हेक्टरमध्ये तूर, ३५० हेक्टरमध्ये भाजीपाल्याची विविध पिके, २५ हेक्टरमध्ये मका, ७५ हेक्टरमध्ये साेयाबीन, चार हेक्टरमध्ये विविध फुले, दाेन हेक्टरमध्ये हळदीच्या पिकाचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५,९४७ क्विंटल धान, ६७ क्विंटल कपाशी, १३५ क्विंटल तूर, ३७ क्विंटल साेयाबीन, १.५ क्विंटल मक्याच्या बियाण्यांची गरज भासणार असल्याने या बियाण्यांची मागणी नाेंदविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाेगस बियाण्यांमुळे फसगत हाेत असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांनी संशाेधित बियाण्यांचा वापर करावा. बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी तसेच धानाची श्री पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.

....

रासायनिक खतांची मागणी नाेंदविणार

रामटेेक तालुक्यात या खरीप हंगामासाठी ३,५०० मेट्रिक टन युरिया, १,००० मेट्रिक टन डीएपी, ३०० मेट्रिक टन म्युरेट ऑफ पाेटॅश, ९०० मेट्रिक टन सिंगल सुपर फाॅस्फेट, ३०० मेट्रिक टन १०:१५: १५, ७०० मेट्रिक टन २०:२०:००, २०० मेट्रिक टन इतर संयुक्त व मिर रासायनिक खतांची गजर भासणार असल्याने ही मागणी राज्य शासनाकडे नाेंदविण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक ऐवजी जैविक खते वापरण्यावर भर द्यावा. माती परीक्षण करून खतांचे नयाेजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.