शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रामटेकमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: March 10, 2016 03:39 IST

महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता.

नागार्जुन टेकडी प्रकरण : पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा आरोपरामटेक : महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता. जमावाकडून दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना जामीन न मिळाल्यामुळे न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप माजी आ. आशिष जयस्वाल यांनी केला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी रामटेक बंदचे सर्वपक्षीय आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना निवेदन सोपविले. मोर्चादरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागार्जुनप्रकरणी पोलिसांनी संजय भिक्षूलाल दमाहे (२२, रा. चिचाळा), राहुल विद्याधर टोंगसे (३२, रा. रामटेक), अविनाश शेषराव येलुरे (२०, रा. नवरगाव), अशोक हुकुमपुरी गोसावी (४५, रा. घोटीटोक), गोकुल नारायण पाटील (३०, रा. रामटेक) व उमेश सुदाम झाडे (४०, रा. तेलंगखेडी, ता. रामटेक) या सहा जणांना अटक केली तर नरेश माकडे हा फरार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३३ व ४२७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. शिवभक्तांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर रामटेक बंदचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नागार्जुन शिवमंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी जातात आणि त्रिशूल अर्पण करणे ही भक्तांची परंपरा आहे. या बाबीस मागील काही वर्षापासून काही जण आक्षेप घेत आहेत. पोलिसांकडून दरवर्षी शिवभक्तांना संरक्षण मिळते. यावर्षी पोलिसांनी भाविकांना अडवून त्रिशूल नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे भाविक व पोलिसांमध्ये वाद झाला. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, अशी माहिती बंदचे आंदोलकर्त्यांनी दिली. सदर प्रकरणात पोलिसांनी मिळेल त्यास पकडून अटक केली व गुन्हे नोंदविले. अटक केलेल्यांवर भादंवि कलम ३३३ सारखे कलम मुद्दाम दाखल करण्यात आले. कारण अटकेनंतर जामीन मिळू नये असा त्यामागे उद्देश होता. पोलिसांनी शिवभक्तांना संरक्षण देण्याऐवजी प्रथा, परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यास प्रतिबंध केला. दरवर्षी महाशिवरात्रीला नागार्जुन परिसरात तणाव निर्माण होतो, ही माहिती असतानादेखील उपाययोजना म्हणून शांतता समितीची बैठक पोलिसांनी घेतली नाही. दरवर्षीचा तणाव लक्षात घेता योग्य पोलीस बंदोबस्तही नव्हता. असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांकडे घटनास्थळाची चित्रफित असताना त्यामध्ये भाग घेणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता पोलिसांनी मिळेल त्याला अटक करून कारवाई केली, हे योग्य नाही. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावीदरम्यान, बुधवारी माजी आ. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी व जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच नागार्जुनप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना विचारणा केली असता, उच्च न्यायालयाचा या परिसरात ‘जैसे-थे’चा आदेश आहे आणि तो पोलीस व प्रशासनाने पाळताना केलेली कारवाई उचित आहे, असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात योगेश वाडीभस्मे, रमेश कारामोरे, सुनील देवगडे, बिकेंद्र महाजन, अनिल वाघमारे, राजेश किंमतकर,उमेश महाजन, सुमित कोठारी, दिनेश माकडे, धीरज राऊत, राजूबाबा मोहन गिरी महाराज, करीम मालाधारी, दीपक जैन, चुन्नीलाल चौरासिया, राहुल ठाकूर आदींची उपस्थिती होती.