शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

कचऱ्याने बरबटली रामटेक बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

मनाेज जयस्वाल लाेकमत न्यूज नेटवर्क हिवराबाजार : रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराची अवस्था बकाल झाली आहे. येथे साफसफाईचा ...

मनाेज जयस्वाल

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिवराबाजार : रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराची अवस्था बकाल झाली आहे. येथे साफसफाईचा अभाव असल्याने ठिकठिकाणी कचरा व टाकाऊ भाजीपाल्याचे ढीग दिसून येतात. त्या सडक्या भाजीपाल्यावर माेकाट गुरांचा वावर असताे. शिवाय, डासांची पैदास हाेत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांसह दलाल, हमाल, मापारी, ग्राहक यांच्यासह इतरांना मलेरिया व तत्सम कीटकजन्य आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे.

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवड्यातून पाच दिवस भाजीपाल्याचा लिलाव हाेत असल्याने रामटेक, पारशिवनी व माैदा तालुक्यातील १५० ते १७० शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडील भाजीपाला विकायला आणतात. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ५० परवानाधारक व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात त्यांचे ठिय्ये तयार केले आहेत.

भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर टाकाऊ भाजीपाला तिथे आवारात टाकून दिला जाताे. या भाजीपाला व कचऱ्याची नियमित उचल केली जात नसल्याने हा कचरा तिथेच पडून राहताे. पाऊस व दमट वातावरणामुळे नाशिवंत भाजीपाला लवकर सडताे. त्यामुळे या आवाराच्या काही भागात सडलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधीही येते. हा प्रकार सर्वांच्याच आराेग्याला हानीकारक असल्याने बाजार समितीच्या आवाराची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.

...

१४ ते २१ गाड्या भाजीपाल्याची आवक

या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राेज १४ ते २१ गाड्या (मेटॅडाेर, ट्रॅक्टर, छाेटी मालवाहू वाहने) भाजीपाल्याची आवक आहे. येथे भाजीपाल्याचा लिलाव तसेच ठाेक व घाऊक (किरकाेळ) विक्री सकाळी ६ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असते. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ४०० ते ४५० किरकाेळ भाजीपाला विक्रेते आणि १०० ते १२५ नागरिक स्वस्तात भाजीपाला मिळताे म्हणून खरेदी करण्यासाठी या कृषी उत्पन्न समितीच्या आवारात येतात.

...

मूलभूत सुविधांचा अभाव

रामटेक बाजार समितीची वार्षिक उलाढाल एक काेटी रुपयांपेक्षा अधिक आहे. बाजार समितीला वर्षाकाठी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीतून किमान १२ ते १३ लाख रुपयांचे तर धान्याच्या खरेदी विक्रीतून ३५ ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव हनुमंत महाजन यांनी दिली. तुलनेत बाजार समितीच्या आवारात काही मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येताे. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ मुतारी, शाैचालये यांसह अन्य मूलभूत सुविधांची निर्मिती करणेही गरजेचे आहे.

...

साेमवार व शुक्रवारी भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने या दाेन्ही दिवस साफसफाई केली जाते. दाेन्ही दिवस ट्रॅक्टरच्या ट्राॅली भरून सडका भाजीपाला व कचरा गाेळा करून फेकला जाताे व त्याची विल्हेवाट लावली जाते. राेजचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कचऱ्याचे थाेडेफार ढीग पडून राहतात.

- हनुमंत महाजन, सचिव,

कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक.