शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

राममंदिराला प्रशासकीय ‘वन’वास

By admin | Updated: June 20, 2016 02:32 IST

विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात मैलाचा दगड ठरू पाहणारे रामटेक परिसरातील गडमंदिर, कालिदास स्मारक, नारायण टेकडी आदी ऐतिहासिक वारसा जपणारी ठिकाणे ...

वन विभाग घेणार जमिनीचा ताबा : जिल्हाधिकाऱ्यांची ‘प्र्रिंटिंग मिस्टेक ’ ठरणार घातकनागपूर : विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात मैलाचा दगड ठरू पाहणारे रामटेक परिसरातील गडमंदिर, कालिदास स्मारक, नारायण टेकडी आदी ऐतिहासिक वारसा जपणारी ठिकाणे आता प्रशासकीय ‘वन’वासात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर जिल्हाधिकारी यांनी कुठलीही पडताळणी न करता केवळ प्रिटिंग मिस्टेक झाल्याचा आधार घेत संबंधित परिसरातील २०६.७५ एकर अधिक जमीन महसूल विभागाची नसून ती वनविभागाची असल्याचा अहवाल दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अहवालामुळे आता संबंधित सर्व जमिनींचा वनविभागाकडून ताबा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाले तर विदर्भातील पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी २३ मार्च २०१६ रोजी एक बैठक घेतली. या बैठकीत पर्यंटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हेडे यांनी सर्वे नंबर १२७/१ मधील २.८३ हेक्टर जमीन पर्यटन महामंडळाच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तर रामटेकचे उपविभागीय अधिकारी यांनी १९५५ च्या अधिसूचनेनुसार २०.७२ एकर जमीन वन विभागाच्या नावे नोंद असल्याचे सांगितले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मौजा रामटेकमधील एकूण वनअधिसूचित क्षेत्र ६२३.२६ एकर एवढी नोंद असल्याचे सांगत सर्वे नंबरचे क्षेत्र विचारात घेतल्यास ही ‘प्रिटिंग मिस्टेक’ असून २०.७२ एकरऐवजी २०६.७५ हेक्टर असावे, असे मत नोंदविले. एवढेच नव्हे तर संबंधित जमीन महसूल विभागाची नव्हे तर वन विभागाची असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. वास्तविकत: संबंधित २०६ एकर महसूल विभागाच्या ताब्यात आहे. येथे पर्यंटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्प उभारण्यात आले आहे. वनविभाग २५ वर्षांपासून शांत का ?संबंधित जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पर्यटनासाठी या जागेचा वापर केला जात आहे. या जमिनीवर पर्यटन महामंडळाने राजकमल रिसोर्टसह विविध बांधकामही केले आहे. ही जमीन वनविभागाच्या मालकीची होती तर गेल्या २५ वर्षात वनविभागाने कधीच या जमिनीवर दावा का केला नाही, तशी कागदपत्रे का सादर केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.