शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

रामझुल्याचा वनवास पुन्हा वाढला

By admin | Updated: October 15, 2014 01:39 IST

शहरवासी ज्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत आणि आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता ज्याचे काम सतत रेंगाळत आहे त्या रामझुल्याचा वनवास आणखी वाढणार आहे. कंत्राटदार कंपनी अ‍ॅफकॉन्स

हायकोर्ट : कंत्राटदाराला हवा एप्रिल-२०१६ पर्यंत वेळनागपूर : शहरवासी ज्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत आणि आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता ज्याचे काम सतत रेंगाळत आहे त्या रामझुल्याचा वनवास आणखी वाढणार आहे. कंत्राटदार कंपनी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २१ एप्रिल २०१६ पर्यंत, तर प्रथम टप्प्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. कंपनीने प्रकल्प व्यवस्थापक अरुणकुमार मोदुकरी यांच्यामार्फत मुदतवाढीसाठी अर्ज दाखल केला आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण न होण्याची विविध कारणे अर्जात नमूद करण्यात आली आहेत. रामझुल्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्याकरिता नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सने जनहित याचिका दाखल केली होती. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून संपूर्ण प्रकल्प ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. तत्कालीन न्यायमूर्तीद्वय पी. व्ही. हरदास व एम. एल. तहलियानी यांनी त्यांचे म्हणणे स्वीकारून ६ जुलै २०१२ रोजी जनहित याचिका निकाली काढली होती. या प्रकरणात विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशनने (व्हीटीए) सचिव तेजिंदरसिंग रेणू यांच्यामार्फत मध्यस्थी अर्ज केला होता. हा अर्जही न्यायालयाने मंजूर केला होता.शासन व कंपनीने न्यायालयासमक्ष दिलेल्या ग्वाहीनुसार रामझुल्याचे बांधकाम ३० आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अशक्य आहे. प्रकल्पाचा पहिलाच टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. परिणामी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन मुदत वाढवून मागितली आहे. या प्रकरणावर आज, मंगळवारी न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मध्यस्थ व्हीटीएचे वकील हरनिश गढिया यांनी कंपनीच्या अर्जाची प्रत मिळाली नसल्याचे सांगून अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून पुढील सुनावणी २७ आॅक्टोबर रोजी निश्चित केली. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांत म्हणजे आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु १०५ महिने लोटल्यानंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. अ‍ॅफकॉन्सतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)