शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न रामदास आठवले : भारत भीमयात्राचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:04 IST

जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे.

नागपूर : जाती तोडो, भारत जोडो हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमाचा प्रयत्न आहे, असे विचार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी येथे मांडले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) नागपूर जिल्ह्याच्यावतीने मंगळवारी संविधान चौकात भारत भीम यात्राचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर रिपाई (ए)चे महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, भीमराव बन्सोड, एल.के. मडावी, पवन गजभिये, केशव धाबर्डे, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, राजन वाघमारे, दादाकांत धनविजय आदी उपस्थित होते.खा. आठवले म्हणाले, समाजात परिवर्तन होत असताना खैरलांजी सारखे प्रकरण घडत आहे. म्हणून आपण जागे होऊन, एकत्र येऊन या विरोधात लढा दिला पाहिजे. परंतु अजूनही आपण गटागटात विखुरल्या गेलो आहोत. नागपुरातील उत्तर नागपूरची जागा सोडल्यास कुठूनच आपण आपल्या मतावर निवडून येत नाही.या उलट दुसरे नेते आपल्या मतांवर निवडून येत आहे. भाजपाला साथ दिली याचा अर्थ असा नव्हे की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘अजेंडा’ चालवितो. ही एक राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही या पक्षासोबत राहूच असे नाही, असेही ते म्हणाले. भूपेश थुलकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत मंगळवारी नागपुरात आली आहे. या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थळ महू या ठिकाणी होईल. त्यांनी यावेळी विदर्भात समता सैनिक दलाची स्थापना करण्यासाठी जबाबदारी स्वीकारा, असे आवाहन केले.यावेळी सुधाकर तायडे, दुर्वास चौधरी, भीमराव बन्सोड, बाळू घरडे व अनिल गोंडाणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक आर.एस. वानखेडे यांनी केले. संचालन राजू बहादुरे यांनी तर आभार डॉ. मनोज मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणाररिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी भूमिका आहे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, असा माझा नारा आहे. परंतु या नंतर जर कुणी फाटाफूट करीत असेल तर त्याला आपल्या जिल्ह्यात, शहरात पाय ठेवू देऊ नका, असे आवाहन खा. आठवले यांनी केले.