शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राम मंदिरसाठी मोदी सरकारवर दबाव आणणार

By admin | Updated: December 27, 2016 02:59 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला

विहिंप आक्रमक : नागपुरात अधिवेशनाला सुरुवात नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला या सरकारने बासनात गुंडाळले असल्याचे हिदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा विषय पुन्हा तापवून मोदी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती विश्व हिंदू परिषदेने आखली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नागपुरात आजपासून सुरू झालेल्या विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. हे अधिवेशन एक आठवडा चालणार असून, पहिल्या टप्प्यातील बैठकीला कापसी येथील माँ उमिया धाम परिसरात सुरुवात झाली आहे. उद्घाटन सत्राला विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. विहिंपची ही अंतर्गत बैठक असल्याने यापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.भाजप गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी अयोध्येत राम मंंदिर उभारण्याचे आश्वासन देत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु राम मंदिर उभारण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही. राम मंदिराच्या मुद्याला बगल दिल्याने देशभरातील साधू-संत भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर अधिवेशनात चर्चा घडवून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप व्यूहरचना आखणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान खुले अधिवेशन होणार आहे. यात ३५ देशांतील ४४ प्रांतातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वीचे अधिवेशन हरिद्वार, काशी, मथुरा व दिल्ली आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नागपुरात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य अधिवेशन होत आहे. विहिंपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अन्य काही राज्यांत गोवंश संरक्षण कायदा करण्यात आला आहे. परंतु कत्तलखान्यात जाणारे गोवंश पकडल्यानतंर त्यांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावे, याचा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोवंशाचे पालन करण्याची क्षमता देशभरातील गोशाळांत नाही. त्यामुळे गोवंशाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर मंथन रेशीमबाग येथे पार पडलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत विहिंप नेतेसुद्धा गंभीर आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अधिवेशनात मंथन होणार आहे. तसेच संघटनात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.