शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राम मंदिरसाठी मोदी सरकारवर दबाव आणणार

By admin | Updated: December 27, 2016 02:59 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला

विहिंप आक्रमक : नागपुरात अधिवेशनाला सुरुवात नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला या सरकारने बासनात गुंडाळले असल्याचे हिदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा विषय पुन्हा तापवून मोदी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती विश्व हिंदू परिषदेने आखली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नागपुरात आजपासून सुरू झालेल्या विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. हे अधिवेशन एक आठवडा चालणार असून, पहिल्या टप्प्यातील बैठकीला कापसी येथील माँ उमिया धाम परिसरात सुरुवात झाली आहे. उद्घाटन सत्राला विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. विहिंपची ही अंतर्गत बैठक असल्याने यापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.भाजप गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी अयोध्येत राम मंंदिर उभारण्याचे आश्वासन देत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु राम मंदिर उभारण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही. राम मंदिराच्या मुद्याला बगल दिल्याने देशभरातील साधू-संत भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर अधिवेशनात चर्चा घडवून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप व्यूहरचना आखणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान खुले अधिवेशन होणार आहे. यात ३५ देशांतील ४४ प्रांतातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वीचे अधिवेशन हरिद्वार, काशी, मथुरा व दिल्ली आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नागपुरात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य अधिवेशन होत आहे. विहिंपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अन्य काही राज्यांत गोवंश संरक्षण कायदा करण्यात आला आहे. परंतु कत्तलखान्यात जाणारे गोवंश पकडल्यानतंर त्यांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावे, याचा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोवंशाचे पालन करण्याची क्षमता देशभरातील गोशाळांत नाही. त्यामुळे गोवंशाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर मंथन रेशीमबाग येथे पार पडलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत विहिंप नेतेसुद्धा गंभीर आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अधिवेशनात मंथन होणार आहे. तसेच संघटनात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.