शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राम मंदिरसाठी मोदी सरकारवर दबाव आणणार

By admin | Updated: December 27, 2016 02:59 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला

विहिंप आक्रमक : नागपुरात अधिवेशनाला सुरुवात नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला या सरकारने बासनात गुंडाळले असल्याचे हिदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा विषय पुन्हा तापवून मोदी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती विश्व हिंदू परिषदेने आखली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नागपुरात आजपासून सुरू झालेल्या विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. हे अधिवेशन एक आठवडा चालणार असून, पहिल्या टप्प्यातील बैठकीला कापसी येथील माँ उमिया धाम परिसरात सुरुवात झाली आहे. उद्घाटन सत्राला विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. विहिंपची ही अंतर्गत बैठक असल्याने यापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.भाजप गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी अयोध्येत राम मंंदिर उभारण्याचे आश्वासन देत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु राम मंदिर उभारण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही. राम मंदिराच्या मुद्याला बगल दिल्याने देशभरातील साधू-संत भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर अधिवेशनात चर्चा घडवून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप व्यूहरचना आखणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान खुले अधिवेशन होणार आहे. यात ३५ देशांतील ४४ प्रांतातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वीचे अधिवेशन हरिद्वार, काशी, मथुरा व दिल्ली आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नागपुरात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य अधिवेशन होत आहे. विहिंपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अन्य काही राज्यांत गोवंश संरक्षण कायदा करण्यात आला आहे. परंतु कत्तलखान्यात जाणारे गोवंश पकडल्यानतंर त्यांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावे, याचा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोवंशाचे पालन करण्याची क्षमता देशभरातील गोशाळांत नाही. त्यामुळे गोवंशाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर मंथन रेशीमबाग येथे पार पडलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत विहिंप नेतेसुद्धा गंभीर आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अधिवेशनात मंथन होणार आहे. तसेच संघटनात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.