शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

काळाच्या ओघात राम गणेश गडकरींचे विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे काव्य लिहिणारे गोविंदाग्रज आणि विनोदी लेखनातून हास्यांचा पेटारा खोलणारे बाळकराम यांची २३ जानेवारी २०२१ रोजी १०२ वी पुण्यतिथी आहे. मात्र, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाची वाणवाच दिसून येते. कारणे कोरोनाची सांगितली जातील आणि झालेल्या विस्मरणावर पांघरुण टाकले जाईल, हे वास्तव आहे.

मृत्यूसवे ओसणारा काळ व्यक्तीचे स्मरण पुसट करत जातो. व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या कृती अन् साहित्य इतिहासात कोरल्या जातात. काही दिवस त्या उल्लेखनीय कार्याचा गलबला केला जातो आणि नंतर तोही शांत होतो. याचा प्रत्यय प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या रूपाने दिसून येतो. उणे-पुरे १७-१८ दिवसांचा सहवास नागपूर-सावनेरच्या वाट्याला त्यांचा आला. लाभलेला हा सहवास त्यांच्या अखेरच्या श्वासाचा होता. त्याचमुळे सावनेरशी त्यांचे नाव जोडले गेले आणि जागतिक नाट्यविश्वात सावनेर अमर झाले. असे असले तरी त्यांचे वास्तव्य झालेल्या त्या घराशिवाय, बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाशिवाय आणि एका पुतळ्याशिवाय दुसरे काहीच नाही. घराला घरपण कुटुंबातील सदस्यांमुळे असते. अगदी तसेच मोठ्या नावाचे जागरण त्यांच्या कलाकृतींच्या अस्तित्वामुळे असते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नागपूर व सावनेर येथील काही गडकरीप्रेमी लोकांनी गडकरी यांच्या स्मारकरूपी घराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. शिवाय, घरात टांगण्यात आलेल्या गडकऱ्यांच्या फोटोंना संदर्भ कथा जोडण्यासोबतच घराच्या मागील वऱ्हांड्यात छोटे ऑडिटोरियम साकारण्याचा विचार होता. मात्र, बोलणी आणि करणी यात जे अंतर दिसून येते, ते येथेही दिसून आले. हळूहळू तो मुद्दाच मागे सरला. नाट्यपरिषदेकडूनही नाट्यउपक्रम वगळता केवळ फोटोला हार घालून बोलघेवड्या वचनांची बरसातच केली जाते. त्यामुळे पुढच्या पिढीपुढे राम गणेश गडकरी म्हणजे कोण, असाच प्रश्न पडणार हे निश्चित.

नाट्यपरिषदेचा महोत्सव आजवर न झाला

- तीन वर्षापूर्वी राम गणेश गडकरी यांच्या पुण्यस्मरण शताब्दी वर्षानिमित्त रा.ग. महोत्सव घेण्याची घोषणा नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेतर्फे करण्यात आली होती. मात्र, घोषणेचा विसर पडला आणि ना शताब्दी साजरी झाली ना तो महोत्सव. आजही अनेक रंगकर्मी या महोत्सवाची वाट बघत आहेत, हे विशेष.

.........