शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघात राम गणेश गडकरींचे विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे काव्य लिहिणारे गोविंदाग्रज आणि विनोदी लेखनातून हास्यांचा पेटारा खोलणारे बाळकराम यांची २३ जानेवारी २०२१ रोजी १०२ वी पुण्यतिथी आहे. मात्र, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाची वाणवाच दिसून येते. कारणे कोरोनाची सांगितली जातील आणि झालेल्या विस्मरणावर पांघरुण टाकले जाईल, हे वास्तव आहे.

मृत्यूसवे ओसणारा काळ व्यक्तीचे स्मरण पुसट करत जातो. व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या कृती अन् साहित्य इतिहासात कोरल्या जातात. काही दिवस त्या उल्लेखनीय कार्याचा गलबला केला जातो आणि नंतर तोही शांत होतो. याचा प्रत्यय प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या रूपाने दिसून येतो. उणे-पुरे १७-१८ दिवसांचा सहवास नागपूर-सावनेरच्या वाट्याला त्यांचा आला. लाभलेला हा सहवास त्यांच्या अखेरच्या श्वासाचा होता. त्याचमुळे सावनेरशी त्यांचे नाव जोडले गेले आणि जागतिक नाट्यविश्वात सावनेर अमर झाले. असे असले तरी त्यांचे वास्तव्य झालेल्या त्या घराशिवाय, बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाशिवाय आणि एका पुतळ्याशिवाय दुसरे काहीच नाही. घराला घरपण कुटुंबातील सदस्यांमुळे असते. अगदी तसेच मोठ्या नावाचे जागरण त्यांच्या कलाकृतींच्या अस्तित्वामुळे असते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नागपूर व सावनेर येथील काही गडकरीप्रेमी लोकांनी गडकरी यांच्या स्मारकरूपी घराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. शिवाय, घरात टांगण्यात आलेल्या गडकऱ्यांच्या फोटोंना संदर्भ कथा जोडण्यासोबतच घराच्या मागील वऱ्हांड्यात छोटे ऑडिटोरियम साकारण्याचा विचार होता. मात्र, बोलणी आणि करणी यात जे अंतर दिसून येते, ते येथेही दिसून आले. हळूहळू तो मुद्दाच मागे सरला. नाट्यपरिषदेकडूनही नाट्यउपक्रम वगळता केवळ फोटोला हार घालून बोलघेवड्या वचनांची बरसातच केली जाते. त्यामुळे पुढच्या पिढीपुढे राम गणेश गडकरी म्हणजे कोण, असाच प्रश्न पडणार हे निश्चित.

नाट्यपरिषदेचा महोत्सव आजवर न झाला

- तीन वर्षापूर्वी राम गणेश गडकरी यांच्या पुण्यस्मरण शताब्दी वर्षानिमित्त रा.ग. महोत्सव घेण्याची घोषणा नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेतर्फे करण्यात आली होती. मात्र, घोषणेचा विसर पडला आणि ना शताब्दी साजरी झाली ना तो महोत्सव. आजही अनेक रंगकर्मी या महोत्सवाची वाट बघत आहेत, हे विशेष.

.........