शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

राजू शेट्टी देणार एनडीएला सोडचिठ्ठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:23 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याच्या अटीवरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रात एनडीएला समर्थन दिले होते.मात्र, दिलेल्या आश्वासनाबाबत केंद्र सरकार संवेदनशील दिसत नाही. त्यामुळे आता यापुढे एनडीएशी संबंध ठेवायचे का, याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे खा. शेट्टी म्हणाले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आले आहे. आता खोत हे मंत्रिपदावर भाजपाकडून आहेत की स्वाभिमानीच्या कोट्यातून याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.खोत यांचा विधान परिषदेचा अर्ज भरताना भाजपाने स्वत:चा ए-बीफॉर्म जोडून तेव्हाच धोका दिला होता. त्यानंतर सदाभाऊंचीही वागणूक बदलली. त्यांनी पुणतांबायेथील शेतकºयांचे आंदोलन तोडण्याचा प्रयत्नकेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार नाहीआपण केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत; पण त्यांना आधार नाही. आपण कधीही भाजपा नेत्यांकडे मागणी केलेली नाही. न मागता देईल एवढे भाजपाचे नेतृत्व उदारमतवादी नाही. मात्र, शेतकºयांचे प्रश्न न सोडविल्यामुळे केंद्र सरकारने मंत्रिपदाची आॅफर दिली तरी आपण ती स्वाकीरणार नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.