शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा

By admin | Updated: September 24, 2015 03:33 IST

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी राजरत्न अशोक आंबेडकर यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य ...

बाबासाहेबांच्या पुतण्याचे नातू : भदंत सुरेई ससाई यांनी दिले चीवर दान नागपूर : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी राजरत्न अशोक आंबेडकर यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर यांचे ते नातू आहेत. बुधवारी इंदोरा येथील बुद्ध विहारात आयोजित छोटेखानी समारंभात भदंत ससाई यांनी त्यांना चीवर दान दिले. तसेच धम्म आंबेडकर असे त्यांचे नामकरण केले. यापुढे ते धम्म या नावानेच ओळखले जातील. श्रामणेर दीक्षा ग्रहण केल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी आहेत. त्यांचे वडील अशोक आंबेडकर हे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आहेत. राजरत्न हे स्वत: मुंबईतील डॉ. आंबेडकर महाविद्यलयात अधिव्याख्याता असून पीएचडी करीत आहेत. यापुढे आपण संपूर्ण आयुष्य हे बौद्ध धम्माच्या कार्यात घालवणार आहोत. भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. केवळ स्वप्नच पाहिले नसून त्यादिशेने जाण्यासाठी त्यांनी १० सूत्री कार्यक्रम सुद्धा आखून दिला होता. त्यापैकी ८ वा कार्यक्रम हा देशात प्रशिक्षित युवा बौद्ध भंते तयार करण्याचा होता. त्यादिशेने आपण स्वत:पासून सुरुवात केली आहे. येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे ५ लाख नवीन सदस्य तयार करण्याचा संकल्प आपण केला असून त्यासाठी देशभरात फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)या दिवसाचे विशेष महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेमुळे जो अपमान सहन करावा लागला, तो संपूर्ण जगालाच माहीत आहे. परंतु गुजरातमध्ये झालेल्या अपमानानंतर त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. तो दिवस २३ सप्टेंबर हा असून तो संकल्प दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे आजच्याच दिवशी श्रामणेर दीक्षा ग्रहण करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.