शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा

By admin | Updated: September 24, 2015 03:33 IST

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी राजरत्न अशोक आंबेडकर यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य ...

बाबासाहेबांच्या पुतण्याचे नातू : भदंत सुरेई ससाई यांनी दिले चीवर दान नागपूर : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी राजरत्न अशोक आंबेडकर यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर यांचे ते नातू आहेत. बुधवारी इंदोरा येथील बुद्ध विहारात आयोजित छोटेखानी समारंभात भदंत ससाई यांनी त्यांना चीवर दान दिले. तसेच धम्म आंबेडकर असे त्यांचे नामकरण केले. यापुढे ते धम्म या नावानेच ओळखले जातील. श्रामणेर दीक्षा ग्रहण केल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी आहेत. त्यांचे वडील अशोक आंबेडकर हे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आहेत. राजरत्न हे स्वत: मुंबईतील डॉ. आंबेडकर महाविद्यलयात अधिव्याख्याता असून पीएचडी करीत आहेत. यापुढे आपण संपूर्ण आयुष्य हे बौद्ध धम्माच्या कार्यात घालवणार आहोत. भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. केवळ स्वप्नच पाहिले नसून त्यादिशेने जाण्यासाठी त्यांनी १० सूत्री कार्यक्रम सुद्धा आखून दिला होता. त्यापैकी ८ वा कार्यक्रम हा देशात प्रशिक्षित युवा बौद्ध भंते तयार करण्याचा होता. त्यादिशेने आपण स्वत:पासून सुरुवात केली आहे. येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे ५ लाख नवीन सदस्य तयार करण्याचा संकल्प आपण केला असून त्यासाठी देशभरात फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)या दिवसाचे विशेष महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेमुळे जो अपमान सहन करावा लागला, तो संपूर्ण जगालाच माहीत आहे. परंतु गुजरातमध्ये झालेल्या अपमानानंतर त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. तो दिवस २३ सप्टेंबर हा असून तो संकल्प दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे आजच्याच दिवशी श्रामणेर दीक्षा ग्रहण करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.