शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दिल्लीतील आंबेडकर स्मारकाला मिळावा राजघाटचा दर्जा

By admin | Updated: November 18, 2015 03:18 IST

दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्मारकाला राजघाटप्रमाणे दर्जा मिळावा, अशी मागणी डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सम्मान-कार्यक्रम समितीने केला आहे.

नागपूर : दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्मारकाला राजघाटप्रमाणे दर्जा मिळावा, अशी मागणी डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सम्मान-कार्यक्रम समितीने केला आहे. या मागणीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेत उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री संघप्रिय गौतम यांनी या मागणीची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीच्या २६ अलीपूर रोड येथे असलेल्या याच निवासस्थानात डॉ. बाबासाहेबांचे निर्वाण झाले होते. समितीच्या आंदोलनानंतर २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने बाबासाहेबांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक घोषित केले होते. सरकार बदलल्यानंतर या स्मारकाला राजघाटचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब हे मानव अधिकाराचा पुरस्कार करणारे देशाचे महान पुत्र होते. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या राजकीय पाहुण्यांनी या स्मारकाचे दर्शन घ्यावे यासाठी कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी गौतम यांनी केली. परिनिर्वाण भूमीला व्यापक स्वरूप देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार आहे व पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने इंदू मिलची जागा व बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाचा तिढा सुटला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी ही मागणीही पूर्ण करतील, असा विश्वास संघप्रिय गौतम यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रपरिषदेला सेवक गजभिये, अलकाताई कांबळे, प्रमोद तभाने आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)