शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचाय!

By admin | Updated: September 27, 2015 02:28 IST

शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे.

विठ्ठल वाघ : मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी मतांच्या ध्रुवीकरणाला प्रारंभ नागपूर : शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे संघटन प्रभावी नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण फार व्यथित होतो. त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या जगण्याचीच मग कविता होते. संमेलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. विदर्भातील ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी यंदा संमेलनाध्यक्ष होण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल तीन दिवस विदर्भातील मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. वैदर्भीयांसह विदर्भ साहित्य संघाचा पाठिंबा मला मिळतो आहे, असे ते म्हणाले. मुळात ज्येष्ठ साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होण्यासाठी एवढी पायपीट करावी लागणे दुर्दैवी आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानानेच देण्यात यावे, याबाबत अनेकदा आपण आग्रही मागणी केली; पण लोकशाही प्रक्रियेमुळे काही बाबींना इलाज नसतो. महामंडळाच्या घटनेतच त्यासाठी सुधारणा करण्याची गरज आहे. कारण लोकशाहीच्या नावाखाली होणारी ही निवडणूक म्हणावी तशी पारदर्शक होत नाही. वेगवेगळे दबाव गट आणि त्यांचे राजकारण या निवडणुकीतही चालतेच. निवडून आलो तर शेतकऱ्यांसाठी व मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी काम करणार, आहे. आतापर्यंत साहित्यिक म्हणून मिरविले नाही, कारण मी जे अनुभवले तेच मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे दु:ख जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच १० शेतकरी कुटुंबांना उभे करण्यासाठी काही मदत केली. साहित्य संमेलन शासनाच्या अनुदानावर होते, त्याला आपला विरोध आहे. मराठी भाषेच्या उत्सवात राजकारणाचा प्रभाव नसलाच पाहिजे; कारण साहित्य हे माणसाच्या जगण्याच्या संवेदना मांडणारे क्षेत्र आहे.(प्रतिनिधी)विचारवंतांची हत्या हा सांस्कृतिक दहशतवादच दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या होणे समाजासाठी दुर्दैवी आहे. विचारांचा विरोध करण्यासाठी वैचारिक पात्रता असावी लागते. ज्यांची पात्रता नसते असेच लोक हत्येसारखे भ्याड कृत्य करतात. समाजात वेगवेगळ्या विचारांचे लोक असणे हीच समाजाची समृद्धता आहे. यात वैचारिक संघर्ष अटळ आहे. असा संघर्ष समाजाला समोर नेणारा असतो. पण वैचारिक संघर्षात मात मिळत असेल तर विचारवंतांची हत्या करणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. अशा लोकांपासून सावध राहायला हवे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे, असे मत विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.