शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

समाजकंटकांच्या विरोधात आवाज उठवा

By admin | Updated: November 22, 2015 03:09 IST

शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, ...

विश्वास कुळकर्णी महाराज : कीर्तन महोत्सवनागपूर : शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, विजयासाठी लढण्याची शिकवण दिली आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींची समाजाला आवश्यकता आहे. आपल्या देवतांनी देखील दुर्जनांचा सामना करण्यासाठी शस्त्र हाती घेतले होते. त्यामुळे आपणही समाज कंटकांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याची गरज आहे, असे मत कीर्तनकार विश्वास कुळकर्णी महाराज यांनी व्यक्त केले.संवेदना परिवार संस्था व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आयोजित कीर्तन महोत्सवात दुसरे पुष्प पुणे येथील विश्वास कुळकर्णी महाराज यांनी गुंफले. या वेळी कुळकर्णी महाराज म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची गरज ओळखून ३८ व्या स्वातंत्र्य संमेलनाचे अध्यक्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या’ असे म्हटले होते. तर, मानवाने कसे जगावे याची नियमावली म्हणजे शास्त्र होय. मात्र, शस्त्र हाती घेण्याची शिकवण जर दिल्या जात नसेल तर ते शस्त्र काय कामाचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संतांची बाह्य व आंतर लक्षणे उलगडून सांगत असतानाच त्यांनी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या चाफेकर बंधू यांची शौर्यगाथा विषद केली. वासुदेव बळवंत फडके यांनी मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाच्या बातमीने प्रेरित होऊन चाफेकर बंधू यांनी देश सेवेचा ध्यास घेतला. टिळकांसोबत मिळून पुढे गणेशोत्सव व शिवजयंती महोत्सव सुरू केला. देशप्रेमापोटी चाफेकर बंधू फासावर चढले, असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव करावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, आ. डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)