शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

समाजकंटकांच्या विरोधात आवाज उठवा

By admin | Updated: November 22, 2015 03:09 IST

शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, ...

विश्वास कुळकर्णी महाराज : कीर्तन महोत्सवनागपूर : शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, विजयासाठी लढण्याची शिकवण दिली आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींची समाजाला आवश्यकता आहे. आपल्या देवतांनी देखील दुर्जनांचा सामना करण्यासाठी शस्त्र हाती घेतले होते. त्यामुळे आपणही समाज कंटकांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याची गरज आहे, असे मत कीर्तनकार विश्वास कुळकर्णी महाराज यांनी व्यक्त केले.संवेदना परिवार संस्था व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आयोजित कीर्तन महोत्सवात दुसरे पुष्प पुणे येथील विश्वास कुळकर्णी महाराज यांनी गुंफले. या वेळी कुळकर्णी महाराज म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची गरज ओळखून ३८ व्या स्वातंत्र्य संमेलनाचे अध्यक्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या’ असे म्हटले होते. तर, मानवाने कसे जगावे याची नियमावली म्हणजे शास्त्र होय. मात्र, शस्त्र हाती घेण्याची शिकवण जर दिल्या जात नसेल तर ते शस्त्र काय कामाचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संतांची बाह्य व आंतर लक्षणे उलगडून सांगत असतानाच त्यांनी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या चाफेकर बंधू यांची शौर्यगाथा विषद केली. वासुदेव बळवंत फडके यांनी मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाच्या बातमीने प्रेरित होऊन चाफेकर बंधू यांनी देश सेवेचा ध्यास घेतला. टिळकांसोबत मिळून पुढे गणेशोत्सव व शिवजयंती महोत्सव सुरू केला. देशप्रेमापोटी चाफेकर बंधू फासावर चढले, असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव करावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, आ. डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)