शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पावसाळ्यात काढावी लागते चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या तुलनेत पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीला आजही फारसे महत्त्व दिले जात नाही. माेवाड (ता. नरखेड) शहराला दाेन महत्त्वाच्या पांदण रस्त्यांचा वापर स्थानिक शेतकरी शेतीच्या वहिवाटीसाठी वर्षानुवर्षे करीत आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे या दाेन्ही रस्त्यांवरून चालणे कठीण जाते. शासनाकडे वारंवार मागणी करूनही या दाेन्ही पांदण रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.

राेहिणी नक्षत्र ताेंडावर असून, समाधानकारक पाऊस काेसळताच पेरणीला सुरुवात हाेणार आहे. विशेष म्हणजे, माेवाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या दाेन्ही पांदण रस्त्यालगत आहे. या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जे-जा करण्यासाठी तसेच बियाणे, खतांची तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी या दाेन रस्त्यांवाचून गत्यंतर नाही. पाऊस काेसळताच दाेन्ही रस्त्यांची चिखल हाेत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते.

या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करण्यात आली. माजी आ. डाॅ. आशीष देशमुख यांच्या काळात या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, मागील चार वर्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माेवाड येथील रवी माळोदे, नीलेश गुरू, राहुल घावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुरांना दुखापत

या पांदण रस्त्याने पावसाळ्यात काेणतीही छाेटी वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागताे. बैलगाडीची चाके चिखलात रुतण्यापासून तर बैलांच्या पायांना दुखापत हाेण्याच्या घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात आर्थिक अडचणी असतात. याच काळात जनावरांना दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारावर अतिरिक्त खर्चही करावा लागताे. माेवाड शहराला लागून असलेल्या वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना आमच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.