शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात काढावी लागते चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या तुलनेत पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीला आजही फारसे महत्त्व दिले जात नाही. माेवाड (ता. नरखेड) शहराला दाेन महत्त्वाच्या पांदण रस्त्यांचा वापर स्थानिक शेतकरी शेतीच्या वहिवाटीसाठी वर्षानुवर्षे करीत आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे या दाेन्ही रस्त्यांवरून चालणे कठीण जाते. शासनाकडे वारंवार मागणी करूनही या दाेन्ही पांदण रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.

राेहिणी नक्षत्र ताेंडावर असून, समाधानकारक पाऊस काेसळताच पेरणीला सुरुवात हाेणार आहे. विशेष म्हणजे, माेवाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या दाेन्ही पांदण रस्त्यालगत आहे. या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जे-जा करण्यासाठी तसेच बियाणे, खतांची तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी या दाेन रस्त्यांवाचून गत्यंतर नाही. पाऊस काेसळताच दाेन्ही रस्त्यांची चिखल हाेत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते.

या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करण्यात आली. माजी आ. डाॅ. आशीष देशमुख यांच्या काळात या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, मागील चार वर्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माेवाड येथील रवी माळोदे, नीलेश गुरू, राहुल घावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुरांना दुखापत

या पांदण रस्त्याने पावसाळ्यात काेणतीही छाेटी वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागताे. बैलगाडीची चाके चिखलात रुतण्यापासून तर बैलांच्या पायांना दुखापत हाेण्याच्या घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात आर्थिक अडचणी असतात. याच काळात जनावरांना दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारावर अतिरिक्त खर्चही करावा लागताे. माेवाड शहराला लागून असलेल्या वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना आमच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.