शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पावसाळ्यात काढावी लागते चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या तुलनेत पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीला आजही फारसे महत्त्व दिले जात नाही. माेवाड (ता. नरखेड) शहराला दाेन महत्त्वाच्या पांदण रस्त्यांचा वापर स्थानिक शेतकरी शेतीच्या वहिवाटीसाठी वर्षानुवर्षे करीत आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे या दाेन्ही रस्त्यांवरून चालणे कठीण जाते. शासनाकडे वारंवार मागणी करूनही या दाेन्ही पांदण रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.

राेहिणी नक्षत्र ताेंडावर असून, समाधानकारक पाऊस काेसळताच पेरणीला सुरुवात हाेणार आहे. विशेष म्हणजे, माेवाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या दाेन्ही पांदण रस्त्यालगत आहे. या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जे-जा करण्यासाठी तसेच बियाणे, खतांची तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी या दाेन रस्त्यांवाचून गत्यंतर नाही. पाऊस काेसळताच दाेन्ही रस्त्यांची चिखल हाेत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते.

या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करण्यात आली. माजी आ. डाॅ. आशीष देशमुख यांच्या काळात या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, मागील चार वर्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माेवाड येथील रवी माळोदे, नीलेश गुरू, राहुल घावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुरांना दुखापत

या पांदण रस्त्याने पावसाळ्यात काेणतीही छाेटी वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागताे. बैलगाडीची चाके चिखलात रुतण्यापासून तर बैलांच्या पायांना दुखापत हाेण्याच्या घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात आर्थिक अडचणी असतात. याच काळात जनावरांना दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारावर अतिरिक्त खर्चही करावा लागताे. माेवाड शहराला लागून असलेल्या वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना आमच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.