शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात काढावी लागते चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या तुलनेत पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीला आजही फारसे महत्त्व दिले जात नाही. माेवाड (ता. नरखेड) शहराला दाेन महत्त्वाच्या पांदण रस्त्यांचा वापर स्थानिक शेतकरी शेतीच्या वहिवाटीसाठी वर्षानुवर्षे करीत आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे या दाेन्ही रस्त्यांवरून चालणे कठीण जाते. शासनाकडे वारंवार मागणी करूनही या दाेन्ही पांदण रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.

राेहिणी नक्षत्र ताेंडावर असून, समाधानकारक पाऊस काेसळताच पेरणीला सुरुवात हाेणार आहे. विशेष म्हणजे, माेवाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या दाेन्ही पांदण रस्त्यालगत आहे. या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जे-जा करण्यासाठी तसेच बियाणे, खतांची तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी या दाेन रस्त्यांवाचून गत्यंतर नाही. पाऊस काेसळताच दाेन्ही रस्त्यांची चिखल हाेत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते.

या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करण्यात आली. माजी आ. डाॅ. आशीष देशमुख यांच्या काळात या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, मागील चार वर्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माेवाड येथील रवी माळोदे, नीलेश गुरू, राहुल घावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

गुरांना दुखापत

या पांदण रस्त्याने पावसाळ्यात काेणतीही छाेटी वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागताे. बैलगाडीची चाके चिखलात रुतण्यापासून तर बैलांच्या पायांना दुखापत हाेण्याच्या घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात आर्थिक अडचणी असतात. याच काळात जनावरांना दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारावर अतिरिक्त खर्चही करावा लागताे. माेवाड शहराला लागून असलेल्या वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना आमच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.