शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

पावसाची दडी, पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील पिके पाण्याअभावी करपण्याची व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. आर्थिक अडचणींमुळे शासनाने दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

आठवडाभरापूर्वी तालुक्यात सर्वदूर सलग तीन दिवस पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी आटाेपली. त्यातच चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे अंकुरण्याच्या पूर्वीच शेतातील मातीचा वरचा थर कडक यायला सुरुवात झाली. या काळात जमिनीचा वरचा भाग ओलसर असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या अंकुराला जमिनीचा कडक भाग छेदून बाहेर येणे शक्य नसल्याने काही अंकूर आतच मृतवत हाेतात तर काही बाहेर आल्यावर उन्हाच्या तीव्रतेमुळे काेमेजतात. हा प्रकार जलालखेडा परिसरात अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

शेतकरी आधीच संकटात असून, त्या दुबार पेरणीच्या संकटाची भर पडल्यास पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण हाेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने बियाणे व खते खरेदी करावी लागणार असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

पीककर्ज मिळणे अवघड

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फारसे उत्पादन न झाल्याने पीककर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच बॅंका जुन्या पीककर्जाचे नुतनीकरण केल्याशिवाय नवीन पीककर्ज देण्यास तयार नाही. दुबार पेरणीची वेळ ओढवल्यास बियाणे, खते खरेदी करण्यास पैसा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

...

मी साेमवारी पेरणी केली. त्यानंतर पावसाची एकही सर काेसळली नाही. जमीन कडक आली असून, बियाणे अंकुरले नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसे नाही. या निविष्ठा कुणीही उधारीत देत नाही. शासनाने वेळीच मदत न केल्यास शेती पडित ठेवावी लागणार आहे.

- दिलीप झरकर, शेतकरी,

जलालखेडा, ता. नरखेड.