शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पावसाची दडी, पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील पिके पाण्याअभावी करपण्याची व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. आर्थिक अडचणींमुळे शासनाने दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

आठवडाभरापूर्वी तालुक्यात सर्वदूर सलग तीन दिवस पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी आटाेपली. त्यातच चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे अंकुरण्याच्या पूर्वीच शेतातील मातीचा वरचा थर कडक यायला सुरुवात झाली. या काळात जमिनीचा वरचा भाग ओलसर असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या अंकुराला जमिनीचा कडक भाग छेदून बाहेर येणे शक्य नसल्याने काही अंकूर आतच मृतवत हाेतात तर काही बाहेर आल्यावर उन्हाच्या तीव्रतेमुळे काेमेजतात. हा प्रकार जलालखेडा परिसरात अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

शेतकरी आधीच संकटात असून, त्या दुबार पेरणीच्या संकटाची भर पडल्यास पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण हाेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने बियाणे व खते खरेदी करावी लागणार असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

पीककर्ज मिळणे अवघड

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फारसे उत्पादन न झाल्याने पीककर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच बॅंका जुन्या पीककर्जाचे नुतनीकरण केल्याशिवाय नवीन पीककर्ज देण्यास तयार नाही. दुबार पेरणीची वेळ ओढवल्यास बियाणे, खते खरेदी करण्यास पैसा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

...

मी साेमवारी पेरणी केली. त्यानंतर पावसाची एकही सर काेसळली नाही. जमीन कडक आली असून, बियाणे अंकुरले नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसे नाही. या निविष्ठा कुणीही उधारीत देत नाही. शासनाने वेळीच मदत न केल्यास शेती पडित ठेवावी लागणार आहे.

- दिलीप झरकर, शेतकरी,

जलालखेडा, ता. नरखेड.