शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनुष्य’चे आयोजन लांबणीवर

By admin | Updated: October 12, 2015 02:45 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती.

नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती. परंतु नेमक्या याच कालावधीमध्ये दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागावर परिणाम लक्षात घेता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन समोर ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी नवीन तारखांना परवानगी दिली आहे. आता हे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरवर्षी ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ‘इंद्रधनुष्य’चे दरवर्षी विविध विद्यापीठांमध्ये आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा हा यामागचा उद्देश असतो. यंदा ही जबाबदारी नागपूर विद्यापीठाला देण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. नागपूर विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणीही घेण्यात आली. परंतु नोव्हेंबरमध्ये महोत्सवाच्या कालावधीतच दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थी किती प्रमाणात येतील, असा मुद्दा अचानक समोर आला. शिवाय अनेक विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षासुद्धा या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यात नागपूर विद्यापीठाचाही समावेश आहे. परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी महोत्सवामध्ये सहभागी होण्यास पुढाकार घेणार नाहीत व जर विद्यार्थीच राहणार नाहीत तर महोत्सवाची रंगत वाढणारच नाही ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने विचार सुरू केला. विद्यार्थ्यांच्या हातातील संधी जाऊ नये यासाठी ‘इंद्रधनुष्य’च्या तारखा पुढे ढकलण्याबाबत अधिकाऱ्यांचे एकमतदेखील झाले. परंतु या बदलासाठी राज्यपाल कार्यालयाची परवानगी आवश्यक होती. नागपूर विद्यापीठातर्फे याबाबतीत राज्यपाल कार्यालयाला पत्रदेखील पाठविण्यात आले. राज्यपालांनी संपूर्ण मुद्दा लक्षात घेत आयोजनाच्या तारखांमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. नुकतेच विद्यापीठाला त्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले. आता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाकडून तशी तर तयारी सुरू होतीच. परंतु आता हा महोत्सव समोर ढकलण्यात आल्यामुळे तयारीवर काहीही परिणाम पडणार नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांवर परीक्षांचे किंवा अभ्यासाचे फारसे दडपण राहणार नाही. त्यामुळे ‘इंद्रधनुष्य’ची रंगत आणखी वाढेल असा विश्वास नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. निहाल शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)