शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पावसाचे थैमान, सोयाबीनला पुन्हा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील दोन आठवड्यापासून रिमझिम, मुसळधार पावसाच्या सरींनी चांगलेच सतावले आहे. अशातच सोमवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील दोन आठवड्यापासून रिमझिम, मुसळधार पावसाच्या सरींनी चांगलेच सतावले आहे. अशातच सोमवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून पुन्हा परिसरात पावसाचे थैमान बघावयास मिळाले. मंगळवारी अगदी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. कापणीला आलेल्या सोयाबीनला अतिपावसामुळे चांगलाच फटका बसला असून, अद्याप सर्वेक्षणाबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उमरेड विभागात सोयाबीन, कपाशी हे मुख्य पीक मानले जाते. सोयाबीन कापणीच्या अवस्थेत असून, कपाशी बोंडअवस्थेत दिसून येत आहे. अशावेळी संततधार पावसाच्या तडाख्यात पिके काळवंडली आहेत. सोयाबीनमधील दाणा परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच पावसामुळे खेळखंडोबा झाला. हवामान बदलामुळे अनेक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आधीच कोरोनाची दोन वर्षे शेतकऱ्यांना आर्थिक खड्ड्यात टाकणारे ठरले. दुसरीकडे यंदाचा हंगाम सुरुवातीला अत्यंत पोषक असतानाच दोन आठवड्यापासून पावसामुळे सोयाबीनवर कापणीचे संकट उभे ठाकले आहे. कपाशीवरसुद्धा विविध रोंगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, पावसामुळे फवारणीची कामे थांबली आहेत. यामुळे कपाशीलाही चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोयाबीनचे उभे पीक काळे पडत असून शेंगांना कोंब फुटत असल्याचे गंभीर चित्रसुद्धा अनेकांच्या शेतात सुरू झाले आहे. सततच्या पावसामुळे उत्पादनास चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत असून, असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणी आणि काढणीसुद्धा परवडणारी नाही, अशा वेदना व्यक्त होत आहे. पावसाने हाल-बेहाल केले असून लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी केली जात आहे. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.