शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाचे थैमान, सोयाबीनला पुन्हा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील दोन आठवड्यापासून रिमझिम, मुसळधार पावसाच्या सरींनी चांगलेच सतावले आहे. अशातच सोमवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील दोन आठवड्यापासून रिमझिम, मुसळधार पावसाच्या सरींनी चांगलेच सतावले आहे. अशातच सोमवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून पुन्हा परिसरात पावसाचे थैमान बघावयास मिळाले. मंगळवारी अगदी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. कापणीला आलेल्या सोयाबीनला अतिपावसामुळे चांगलाच फटका बसला असून, अद्याप सर्वेक्षणाबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उमरेड विभागात सोयाबीन, कपाशी हे मुख्य पीक मानले जाते. सोयाबीन कापणीच्या अवस्थेत असून, कपाशी बोंडअवस्थेत दिसून येत आहे. अशावेळी संततधार पावसाच्या तडाख्यात पिके काळवंडली आहेत. सोयाबीनमधील दाणा परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच पावसामुळे खेळखंडोबा झाला. हवामान बदलामुळे अनेक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आधीच कोरोनाची दोन वर्षे शेतकऱ्यांना आर्थिक खड्ड्यात टाकणारे ठरले. दुसरीकडे यंदाचा हंगाम सुरुवातीला अत्यंत पोषक असतानाच दोन आठवड्यापासून पावसामुळे सोयाबीनवर कापणीचे संकट उभे ठाकले आहे. कपाशीवरसुद्धा विविध रोंगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, पावसामुळे फवारणीची कामे थांबली आहेत. यामुळे कपाशीलाही चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोयाबीनचे उभे पीक काळे पडत असून शेंगांना कोंब फुटत असल्याचे गंभीर चित्रसुद्धा अनेकांच्या शेतात सुरू झाले आहे. सततच्या पावसामुळे उत्पादनास चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत असून, असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणी आणि काढणीसुद्धा परवडणारी नाही, अशा वेदना व्यक्त होत आहे. पावसाने हाल-बेहाल केले असून लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी केली जात आहे. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.