शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

विदर्भात सर्वदूर पाऊस, नागपूर, वर्धामध्ये ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:07 IST

नागपूर : मागील आठवडाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे अखेर गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ...

नागपूर : मागील आठवडाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे अखेर गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून नागपुरात आलेला पाऊस नऊ वाजेपर्यंत सुरू होता. दुपारनंतर पुन्हा सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरातील अनेक खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने घरांमध्ये शिरले. यामुळे अनेक कुटुंबांची फजिती झाली. दिवसभारत ९९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर ग्रामीणमध्येही अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदीनाले दुथडी भरून वाहिले. शेतातील अंकुरलेली आणि वाढीला लागलेली पिके पावसाअभावी सुकतात की काय अशी भीती असतानाच आलेल्या दमदार पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. उमरेड विभागात मुसळधार पाऊस पडला. रामटेक विभागात संततधार पावसाने शेतकरी समाधानी झाले. काटोल आणि नागपूर ग्रामीण विभागात मध्यम पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

...

विदर्भातही दमदार पाऊस

विदर्भात गुरुवारी सर्वदूर पाऊस झाला. मागील २४ तासांत गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २३.३ मिलीमीटर पाऊस पडला. गोंदिया जिल्ह्यात ४१ मिलीमीटर तर वर्धा जिल्ह्यात २३ मिलीमीटर पावसाची नोंद गुरुवारी सकाळपर्यंत झाली होती. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत १०.५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

...

सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. १० ते १२ जुलै या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा तसेच, घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवण्याचा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.