शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कर्जमाफी नव्हे शेतकरी फसवणूक योजना; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:37 IST

कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मदत करण्याची मागणीकर्जमाफीच्या घोषणेचा बोजवारा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कर्ज माफीच्या आकड्यांचा घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.रघुनाथ पाटील म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विदर्भात फिरत आहोत. नागपूरनंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील परिस्थिती जाणून घेणार आहोत. सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा बोजवारा उडाला आहे. कर्जमाफीच्या योजनेत आकड्यांचा घोळ घालण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकरी आत्महत्येबाबत सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. आता प्रत्यक्षात तेच सत्तेत असतानाही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कर्ज माफीतर नाहीच परंतु शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाही, शेतीमालाला भाव नाही आणि त्यातच विज बिलाचा भार अशा संकटात शेतकरी सापडला आहे. कापसावर बोंडअळी येणार नाही, असा कंपन्यांनी दावा केला होता. परंतु बोंडअळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील कापसाचे पिक बुडाले आहे. या कंपन्यांकडुन नुकसान भरपाई वसुल करून शासनाने ती शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. शेतीकडे बघण्याचा राज्य सरकारचा दृष्टीकोण वाईट आहे. याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. दाळीवरील निर्यात बंदी कायमस्वरुपी उठविण्यात आली नाही. गोवंश हत्या बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाकड जनावरे विकता येत नसल्यामुळे त्यांना पाळण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. वास्तविक ही जनावरे शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड होते. गरज भासली की ते विकता येत होते. पंजाब व कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना मोफत विज आहे. परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कोणत्याच सवलती नाहीत. उद्योगपतींना मात्र कोट्यवधींची मदत केल्या जात असल्यामुळे हे सरकार आहे की व्यापारी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेत सुकाणु समितीचे सदस्य किशोर ढमाले, गणेश जगताप, दिनकर दाभाडे, विजयकुमार शिंदे उपस्थित होते.‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीकॉंग्रेस शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे. पण त्यात शेतकरी सहभागी होतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मोर्चा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असाच प्रकार असल्याचा उपरोधिक टोला रघुनाथ पाटील यांनी लगावला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी काहीच अंमलात आणल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबाबत बोलण्याचा काडीमात्र अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारण