शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

राेड उंच अन् प्रवासी निवारा जमिनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : विविध विकास कामांतर्गत मनसर-रामटेक-तुमसर (जिल्हा) भंडारा या मार्गाच्या चाैपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : विविध विकास कामांतर्गत मनसर-रामटेक-तुमसर (जिल्हा) भंडारा या मार्गाच्या चाैपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले आहे. हा मार्ग जमिनीला समतल तयार करणे अपेक्षित असताना काही ठिकाणी चार तर काही भागात साडेचार ते पाच फूट उंच तयार केला आहे. त्यामुळे या मार्गालगतचा राखी तलाव येथील राेडलगतचा प्रवासी निवारा खाली गेला असून, राेड उंच झाल्याने शाबूत असलेला ताे प्रवासी निवारा निरुपयाेगी ठरत आहे. हा प्रकार लक्षात घेता ‘हा कसला विकास’ अशी प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केल्या आहेत.

रामटेक हे पर्यटनस्थळ, तालुक्याचे ठिकाण, मुख्य बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र असल्याने रामटेक शहर व परिसरात येणाऱ्यांची संख्याही बरीच माेठी आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मनसर-तुमसर मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम हाती घेत या कामाचे कंत्राट बारब्रिक नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. या मार्गावर असलेल्या प्रत्येक गावाला बसथांबा असून, काही गावांमध्ये यापूर्वीच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले असून, ते आजही सुस्थितीत आहे. रामटेक शहरालगतच्या राखी तलावाजवळील बसथांबा हा त्यापैकी एक आहे.

पूर्वी हा बसथांबा राेडला समतल हाेता. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेला राेड या ठिकाणी किमान साडेतीन ते चार फूट उंच करण्यात आल्याने हा प्रवासी निवारा जमिनीत गेल्यागत झाला आहे. या निवाऱ्यातील प्रवाशाला राेडवर यायचे झाल्यास त्याला राेड चढावा लागताे. या ठिकाणाहून नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही बसने राेज प्रवास करतात. त्या सर्वांना या उंच राेडमुळे बसजवळ जाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. भविष्यात हा प्रकार निश्चितच धाेकादायक ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे. अशीच अवस्था या राेडला जाेडणाऱ्या प्रत्येक जाेडरस्त्यांची आहे. दुसरीकडे ही समस्या साेडविण्यासाठी या ठिकाणी नव्याने उंच प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणीही केली जात आहे.

...

पावसाळ्यात हाेणार गैरसाेय

हा राेड उंच असल्याने त्यावरील पावसाचे पाणी हे या प्रवासी निवारा परिसरात साचून राहणार आहे. मुसळधार व संततधार पाऊस बरसल्यास हा निवारा पाण्याचे भरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रवासी व वाटसरूंना त्यात निवारा घेण्याची हिंमत हाेणार नाही. शिवाय, पाऊस सुरू असल्यास प्रवाशांना पावसात उभे राहून बस व इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

...

अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड

या ठिकाणी प्रवाशांची साेय करावयाची झाल्यास प्रशासनाला सुस्थितीत असलेला हा प्रवासी निवारा आधी ताेडावा लागेल. त्यानंतर ती जागा मुरूम व माती टाकून उंच करावी लागेल. तसेच त्यावर नव्याने (राेडला समतल) प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया करावयाची झाल्यास निवारा ताेडणे, जागा उंच करणे व नव्याने बांधकाम करणे यासह अन्य बाबींसाठी प्रशासनाला विनाकारण खर्च करावा लागणार आहे.

...

अपघाताची शक्यता

हा निवारा खाली गेल्याने कुणीही तिथे बसून बस व वाहनांची प्रतीक्षा न करता राेडलगत उभे राहून प्रतीक्षा करतात. हा मार्ग वर्दळीचा असून, त्यावरून सतत जड वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असते. बस किंवा प्रवासी वाहन पकडण्याच्या नादात प्रवासी घाईघाईने राेड ओलांडतील. त्यातून भविष्यात जीवघेणे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.