शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

नियमांना धाब्यावर बसवून धावताहेत रेडियो कॅब

By admin | Updated: August 27, 2016 02:11 IST

शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : परमिटशिवाय सुरू आहे व्यवसायनागपूर : शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या अनेक संचालकांकडे परमिट नसून चालकाच्या मनात येईल तिथे हे वाहन उभे केले जात असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाहने आॅल इंडिया परमिट असलेली आहेत. परंतु ज्यासाठी हे परमिट मिळवले ते सोडून स्थानिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. आॅल इंडिया परमिटच्या नावावर करात सूट मिळवून शासनाला चुना लावला जात आहे. विशेष म्हणजे, कॅबच्या या गोरखधंद्याकडे परिवहन विभागाचे अजिबात लक्ष नाही. समन्वयच नाहीरेडियो कॅब ही मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून संचलित होते. यात वाहनाचा मालक कुणी वेगळा असतो आणि चालक कुणी वेगळा. याबाबतची सर्व माहिती पोलीस अन् परिवहन विभागालाही नसते. फक्त कमिशन लाटण्यासाठी कॅबला कंपनीशी जोडून प्रवासी वाहतुकीची मुभा दिली जाते. चौकशी का होत नाही?मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार, खासगी टॅक्सीला शहरात चालविण्यासाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. परमिट देण्याआधी आवश्यक पार्किंग स्थळ आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. या निकषांच्या पडताळणीनंतर परमिट दिले जाते. परंतु रेडियो कॅब या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. रेडियो कॅबचे शहरात कार्यालय नाही अन् पार्किंगसाठी निर्धारित जागाही नाही. वाहनांचा दुरुपयोग!मिळालेल्या माहितीनुसार, कॅबने केलेल्या प्रवासाची सर्व माहिती अ‍ॅपमध्ये नोंदविली जाते. परंतु वेळेचे काही बंधन नसते. याचा गैरफायदा काही लोक घेतात. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये पकडले जाऊ नये म्हणून कॅबचा वापर केला जातो. सुविधेच्या नावावर वाहनातच मद्यपानाची सूटही दिली जाते. चालकांची खासगी माहिती उपलब्ध नाहीकॅब चालवणारे अनेक चालक स्थानिक नसल्याने त्यांची खासगी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. शहरात धावणाऱ्या बहुतेक कॅब पर जिल्ह्यातील व प्रदेशातील चालक चालवत असतात. अनेकदा होतात भांडणेस्थानिक आॅटो आणि टॅक्सीचालकांनी कॅबवर कारवाईची मागणी अनेकदा केली आहे. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर सवारी मिळवण्यावरून आॅटो आणि कॅबचालकांमध्ये भांडण ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. हे टाळण्यासाठी आता कॅबचालकांनी रेल्वे स्टेशन फ्लायओव्हर आणि कस्तूरचंद पार्कजवळ डेरा टाकणे सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या आॅटो चालक युनियनच्या कृती समितीने ३१ आॅगस्टला बंदची घोषणा केली आहे. युनियनचे पदाधिकारी अल्ताफ अन्सारी सांगतात, ई-रिक्षा आणि रेडियो कॅबमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. नियम धाब्यावर बसवूनसुद्धा कुणीच या लोकांविरुद्ध कारवाई करीत नाहीत.