शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना धाब्यावर बसवून धावताहेत रेडियो कॅब

By admin | Updated: August 27, 2016 02:11 IST

शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : परमिटशिवाय सुरू आहे व्यवसायनागपूर : शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या अनेक संचालकांकडे परमिट नसून चालकाच्या मनात येईल तिथे हे वाहन उभे केले जात असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाहने आॅल इंडिया परमिट असलेली आहेत. परंतु ज्यासाठी हे परमिट मिळवले ते सोडून स्थानिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. आॅल इंडिया परमिटच्या नावावर करात सूट मिळवून शासनाला चुना लावला जात आहे. विशेष म्हणजे, कॅबच्या या गोरखधंद्याकडे परिवहन विभागाचे अजिबात लक्ष नाही. समन्वयच नाहीरेडियो कॅब ही मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून संचलित होते. यात वाहनाचा मालक कुणी वेगळा असतो आणि चालक कुणी वेगळा. याबाबतची सर्व माहिती पोलीस अन् परिवहन विभागालाही नसते. फक्त कमिशन लाटण्यासाठी कॅबला कंपनीशी जोडून प्रवासी वाहतुकीची मुभा दिली जाते. चौकशी का होत नाही?मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार, खासगी टॅक्सीला शहरात चालविण्यासाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. परमिट देण्याआधी आवश्यक पार्किंग स्थळ आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. या निकषांच्या पडताळणीनंतर परमिट दिले जाते. परंतु रेडियो कॅब या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. रेडियो कॅबचे शहरात कार्यालय नाही अन् पार्किंगसाठी निर्धारित जागाही नाही. वाहनांचा दुरुपयोग!मिळालेल्या माहितीनुसार, कॅबने केलेल्या प्रवासाची सर्व माहिती अ‍ॅपमध्ये नोंदविली जाते. परंतु वेळेचे काही बंधन नसते. याचा गैरफायदा काही लोक घेतात. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये पकडले जाऊ नये म्हणून कॅबचा वापर केला जातो. सुविधेच्या नावावर वाहनातच मद्यपानाची सूटही दिली जाते. चालकांची खासगी माहिती उपलब्ध नाहीकॅब चालवणारे अनेक चालक स्थानिक नसल्याने त्यांची खासगी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. शहरात धावणाऱ्या बहुतेक कॅब पर जिल्ह्यातील व प्रदेशातील चालक चालवत असतात. अनेकदा होतात भांडणेस्थानिक आॅटो आणि टॅक्सीचालकांनी कॅबवर कारवाईची मागणी अनेकदा केली आहे. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर सवारी मिळवण्यावरून आॅटो आणि कॅबचालकांमध्ये भांडण ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. हे टाळण्यासाठी आता कॅबचालकांनी रेल्वे स्टेशन फ्लायओव्हर आणि कस्तूरचंद पार्कजवळ डेरा टाकणे सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या आॅटो चालक युनियनच्या कृती समितीने ३१ आॅगस्टला बंदची घोषणा केली आहे. युनियनचे पदाधिकारी अल्ताफ अन्सारी सांगतात, ई-रिक्षा आणि रेडियो कॅबमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. नियम धाब्यावर बसवूनसुद्धा कुणीच या लोकांविरुद्ध कारवाई करीत नाहीत.