शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आरएसी प्रवासीही करु शकतात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:41 IST

Indian Railways Nagpur Newsआरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देकन्फर्म नसल्यामुळे अनेकांनी रद्द केला प्रवासअनेक जणांना नाही माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊननंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकत असल्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. परंतु आरएसी असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.ज्या प्रवाशांकडे स्वत:चा बर्थ आहे त्यास कन्फर्म तिकीट असे संबोधण्यात येते. आरएसी प्रवाशांना केवळ बसण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आरएसी प्रवाशांना कन्फर्म मानण्यात येत नाही. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला पीएनआर क्रमांक आरएसी असतानाही प्रवास रद्द केला. यात त्यांच्या तिकिटाचे पैसेही त्यांना मिळाले नसून प्रवासापासूनही त्यांना वंचित राहण्याची पाळी आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. परंतु आता आरएसी प्रवासीही प्रवास करू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाने माहिती न दिल्यामुळे गैरसमजकेवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे आरएसी प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला. त्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती.-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे