शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रेल्वे स्टेशन उड्डाणपूल त्वरित पाडा

By admin | Updated: May 23, 2017 02:04 IST

रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत.

गणेश टेकडी मंदिर व जनआक्रोशतर्फे स्वाक्षरी अभियान सुरूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत. मानस चौक व जयस्तंभ चौकाला जोडणारा हा पूल दोन्ही चौकात वाहतुकीची कोंडी करणारा ठरला असून, गणेश टेकडी मंदिरात जाणाऱ्या भाविकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे हा फ्लायओव्हर पाडण्यात यावा, या मागणीसाठी अ‍ॅडव्हायजरी सोसायटी आॅफ गणेश टेम्पल व जनआक्रोश संघटनेने सोमवारपासून स्वाक्षरी अभियान सुरू केले. जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याविषयी माहिती दिली. दहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या उड्डाणपुलाला त्यावेळीही विरोध झाला होता. मात्र प्रशासनाने विचाराअभावी याचे बांधकाम केले. या पुलामुळे रेल्वे स्टेशन आणि टेकडी मंदिरात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. मानस चौकासह मेयो रुग्णालयाकडून व एलआयसी, आरबीआयकडून येणारी वाहने जयस्तंभ चौकात धडकतात. त्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. नागरिकांना दररोज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. वन-वे असल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय या पुलामुळे ऐतिहासिक जयस्तंभ चौकाचीही दुर्दशा झालेली आहे. वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी फ्लायओव्हर बांधण्यात येतो. मात्र दुर्दैवाने या पुलामुळे सोय होण्याऐवजी अडचणीच अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रयोजन नसताना अविचारीपणे या पुलाचे बांधकाम केल्याची टीका कासखेडीकर यांनी केली. या अनेक समस्या पाहता हा पूल त्वरित पाडण्यात यावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. टेकडी मंदिर सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिकराव जवंजाळ यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली. मोहिमेंतर्गत एक लक्ष लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारला निवेदन सोपविणार असल्याचे कासखेडीकर यांनी सांगितले. यासाठी रेल्वे विभागासह विविध ठिकाणी हे अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.न्यायालयानेही व्यक्त केली होती नाराजी२०१० ला एका जनहित याचिकेंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या पुलाच्या बांधकामाविषयी ताशेरे ओढले होते. पुलाखाली तयार केलेले १८० गाळे व्यावसायिकांना वितरित करण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर होतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी न्यायालयाने महापालिकेसह नासुप्र, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी तसेच रेल्वे विभागालाही नोटीस बजावली होती. त्यानंतरही पुलासंदर्भात निर्णय होत नसल्याने ही न्यायालयाच्या आदेशाची अवमानना असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेत गणेश मंदिर सोसायटीचे श्रीराम कुळकर्णी, संगम दडवी, प्रकाश कुंटे, विकास लिमये, संजय जोगळेकर आदी उपस्थित होते.