शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन उड्डाणपूल त्वरित पाडा

By admin | Updated: May 23, 2017 02:04 IST

रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत.

गणेश टेकडी मंदिर व जनआक्रोशतर्फे स्वाक्षरी अभियान सुरूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत. मानस चौक व जयस्तंभ चौकाला जोडणारा हा पूल दोन्ही चौकात वाहतुकीची कोंडी करणारा ठरला असून, गणेश टेकडी मंदिरात जाणाऱ्या भाविकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे हा फ्लायओव्हर पाडण्यात यावा, या मागणीसाठी अ‍ॅडव्हायजरी सोसायटी आॅफ गणेश टेम्पल व जनआक्रोश संघटनेने सोमवारपासून स्वाक्षरी अभियान सुरू केले. जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याविषयी माहिती दिली. दहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या उड्डाणपुलाला त्यावेळीही विरोध झाला होता. मात्र प्रशासनाने विचाराअभावी याचे बांधकाम केले. या पुलामुळे रेल्वे स्टेशन आणि टेकडी मंदिरात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. मानस चौकासह मेयो रुग्णालयाकडून व एलआयसी, आरबीआयकडून येणारी वाहने जयस्तंभ चौकात धडकतात. त्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. नागरिकांना दररोज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. वन-वे असल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय या पुलामुळे ऐतिहासिक जयस्तंभ चौकाचीही दुर्दशा झालेली आहे. वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी फ्लायओव्हर बांधण्यात येतो. मात्र दुर्दैवाने या पुलामुळे सोय होण्याऐवजी अडचणीच अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रयोजन नसताना अविचारीपणे या पुलाचे बांधकाम केल्याची टीका कासखेडीकर यांनी केली. या अनेक समस्या पाहता हा पूल त्वरित पाडण्यात यावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. टेकडी मंदिर सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिकराव जवंजाळ यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली. मोहिमेंतर्गत एक लक्ष लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारला निवेदन सोपविणार असल्याचे कासखेडीकर यांनी सांगितले. यासाठी रेल्वे विभागासह विविध ठिकाणी हे अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.न्यायालयानेही व्यक्त केली होती नाराजी२०१० ला एका जनहित याचिकेंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या पुलाच्या बांधकामाविषयी ताशेरे ओढले होते. पुलाखाली तयार केलेले १८० गाळे व्यावसायिकांना वितरित करण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर होतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी न्यायालयाने महापालिकेसह नासुप्र, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी तसेच रेल्वे विभागालाही नोटीस बजावली होती. त्यानंतरही पुलासंदर्भात निर्णय होत नसल्याने ही न्यायालयाच्या आदेशाची अवमानना असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेत गणेश मंदिर सोसायटीचे श्रीराम कुळकर्णी, संगम दडवी, प्रकाश कुंटे, विकास लिमये, संजय जोगळेकर आदी उपस्थित होते.