शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

आता अपघाताची मिळणार त्वरित माहिती

By admin | Updated: March 29, 2017 02:41 IST

शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात.

विनाहेल्मेट गाडीही होणार नाही ‘स्टार्ट’ : सहा विद्यार्थिनींनी तयार केले ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’ सुमेध वाघमारे   नागपूर शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही वाहनचालक याला गंभीरतेने घेत नाही. यातच अपघात झाल्यास उशिरा मदत मिळत असल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो. याची दखल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी घेतली. त्यांनी तयार केलेल्या ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मुळे हेल्मेटशिवाय गाडी तर स्टार्ट होणारच नाही, शिवाय अपघात झाल्यास याची माहिती घरच्यांना मिळेल. जखमीला तत्काळ मदत पोहचविणे शक्य होईल. संशोधनाच्या क्षेत्रात केव्हा कसा, आणि कोणता शोध लागेल आणि नवीन काय हाती येईल, याचा नेम नाही. असाच एक प्रयोग प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज, डिगडोह हिंगणाच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’च्या अंतिम वर्षाच्या मौसम, अदिती वराडे, नेहा गजभिये, तक्षशीला हाडके, मिनाक्षी खरवडे आणि पारुल नगरकर या सहा विद्यार्थिनींनी केला. दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’ हे नवखे उपकरण तयार केले. याचे प्रात्याक्षिक नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांना दिले. हे उपकरण सर्व दुचाकी चालकांच्या फायद्याचे असल्याचे आरटीओचे प्रमाणपत्रही त्यांना मिळणार आहे. या ‘हेल्मेट बँड’चे अनेक फायदे आहेत. यात वाहनचालकाला सुरक्षा तर मिळेल सोबतच वाहतुकीचे नियम पाळता येईल. आपली काळजी घेणाऱ्यांना आपण कुठे आहात याची माहिती मिळेल, वाहन चोरी टळेल व अपघाताची त्वरित माहिती आप्तांना मिळेल. अपघाताचा मोबाईलवर येईल मॅसेज ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकाचे ‘लोकेशन’ त्याने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘जीएसएम’ मार्फत पोहचविल्या जाते. यामुळे वाहनचालकाचे ठिकाण (लोकेशन) कळते. यातच अपघात झाल्यास याची माहितीही संबंधित मोबाईलवर येते. परिणामी, जखमीला तत्काळ मदत मिळू शकेल. शिवाय, अपघातग्रस्त वाहनातून ‘बझर’ वाजत राहील व ‘एलईडी’ लाईट लागणार असल्याने रहदारी करणाऱ्यांचे लक्षही वेधून घेईल. (प्रतिनिधी)