शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

मोवाड पूरग्रस्तांचे प्रश्न कायमच

By admin | Updated: September 25, 2016 03:18 IST

मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले.

प्रदीप आगलावे : प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाचे विमोचननागपूर : मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले. नैसर्गिक प्रश्नांसह सामाजिक प्रश्नही या पुरामुळे निर्माण झाले होते. मात्र पुनर्वसनाचे नियोजन योग्य रीतीने न केल्यामुळे २५ वर्षानंतरही पूरपीडितांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाने पीडितांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधल्याचे मनोगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले.डॉ. प्रदीप गजभिये यांच्या ‘पूरग्रस्त मोवाड : विस्थापन आणि पुनर्वसन’ या पुस्तकाच्या विमोचन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी, पुस्तकावर भाष्य करण्यासाठी पत्रकार जयदीप हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे व साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले, विकास प्रकल्पग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्ती पीडितांना केवळ मोबदला देऊन चालत नाही तर विस्थापितांचे दु:ख, वेदना समजून घेणे आवश्यक आहे. पीडितांच्या रोजगाराचा, शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती पीडितांच्या पुनर्वसनाबाबत नियोजनाचे विचार मांडले होते. या विचारातून पूरग्रस्तांचे प्रश्न सरकारने सोडवावे, असे आवाहन डॉ. आगलावे यांनी केले.जयदीप हर्डीकर यांनी विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत कोणत्याही सरकारकडून दुर्लक्ष के ल्या जात असल्याची टीका केली. आज देशभरात १० कोटीच्या वर लोक विकास प्रकल्पाचे विस्थापित आहेत. विकास प्रकल्प स्थापन केला जातो व तेथील लोकांना विस्थापित केले जाते. प्रकल्पाच्या २५-५० वर्षानंतरही विस्थापित स्थिरावले जात नाही. गावातील १०० एकराचे मालगुजार विस्थापनानंतर शहरात रिक्षाचालकांचे काम करीत असल्याची व्यथा त्यांनी सोदाहरण मांडली. नैसर्गिक आपत्ती जातधर्माचा विचार करीत नाही, मात्र आपत्तीचे निराकरण करताना अशा वायफळ गोष्टींना महत्त्व दिल्या जात असल्याची खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. विलास भोंगाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे उदाहरण देत विस्थापितांना आपल्याच हक्कासाठी वर्षानुवर्षे का लढावे लागते, हा प्रश्न उपस्थित केला. डॉ. गिरीश गांधी यांनी गजभिये यांचे पुस्तक संशोधनपर आणि अभ्यासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत पुस्तकाचा दुसरा टप्पा काढून मोवाड पूरपीडितांचे दु:ख मांडण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक पवार यांनी केले.(प्रतिनिधी)