शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

मोवाड पूरग्रस्तांचे प्रश्न कायमच

By admin | Updated: September 25, 2016 03:18 IST

मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले.

प्रदीप आगलावे : प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाचे विमोचननागपूर : मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले. नैसर्गिक प्रश्नांसह सामाजिक प्रश्नही या पुरामुळे निर्माण झाले होते. मात्र पुनर्वसनाचे नियोजन योग्य रीतीने न केल्यामुळे २५ वर्षानंतरही पूरपीडितांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाने पीडितांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधल्याचे मनोगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले.डॉ. प्रदीप गजभिये यांच्या ‘पूरग्रस्त मोवाड : विस्थापन आणि पुनर्वसन’ या पुस्तकाच्या विमोचन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी, पुस्तकावर भाष्य करण्यासाठी पत्रकार जयदीप हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे व साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले, विकास प्रकल्पग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्ती पीडितांना केवळ मोबदला देऊन चालत नाही तर विस्थापितांचे दु:ख, वेदना समजून घेणे आवश्यक आहे. पीडितांच्या रोजगाराचा, शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती पीडितांच्या पुनर्वसनाबाबत नियोजनाचे विचार मांडले होते. या विचारातून पूरग्रस्तांचे प्रश्न सरकारने सोडवावे, असे आवाहन डॉ. आगलावे यांनी केले.जयदीप हर्डीकर यांनी विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत कोणत्याही सरकारकडून दुर्लक्ष के ल्या जात असल्याची टीका केली. आज देशभरात १० कोटीच्या वर लोक विकास प्रकल्पाचे विस्थापित आहेत. विकास प्रकल्प स्थापन केला जातो व तेथील लोकांना विस्थापित केले जाते. प्रकल्पाच्या २५-५० वर्षानंतरही विस्थापित स्थिरावले जात नाही. गावातील १०० एकराचे मालगुजार विस्थापनानंतर शहरात रिक्षाचालकांचे काम करीत असल्याची व्यथा त्यांनी सोदाहरण मांडली. नैसर्गिक आपत्ती जातधर्माचा विचार करीत नाही, मात्र आपत्तीचे निराकरण करताना अशा वायफळ गोष्टींना महत्त्व दिल्या जात असल्याची खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. विलास भोंगाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे उदाहरण देत विस्थापितांना आपल्याच हक्कासाठी वर्षानुवर्षे का लढावे लागते, हा प्रश्न उपस्थित केला. डॉ. गिरीश गांधी यांनी गजभिये यांचे पुस्तक संशोधनपर आणि अभ्यासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत पुस्तकाचा दुसरा टप्पा काढून मोवाड पूरपीडितांचे दु:ख मांडण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक पवार यांनी केले.(प्रतिनिधी)