शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचलीच नाही

By admin | Updated: November 5, 2015 03:25 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रांवरील हलगर्जीचा विद्यार्थ्यांना फटका

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रांवरील हलगर्जीचा विद्यार्थ्यांना फटका बसताना दिसत आहे. परंतु सावनेरमधील एका परीक्षा केंद्रावर एकच विद्यार्थी असूनही नियोजन विस्कटल्याचे दिसून आले. संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचलीच नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ उडाली. विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना ३० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. सावनेर येथील भालेराव विज्ञान महाविद्यालय हे परीक्षेचे केंद्र आहे. येथे दुपारी २ ते ५ या कालावधीत इंग्रजी साहित्य या विषयाचा पेपर होता. या पेपरसाठी एकच परीक्षार्थी होता. परंतु पेपरची वेळ आली तरी प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रप्रमुखांनी लगेच फोनाफोनी सुरू केली व विद्यापीठाशी संपर्क साधला. लगेच जवळील परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकेची छायाप्रत आणण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी २० मिनीटे लागली व विद्यार्थ्याला अर्धा तासानंतर पेपर सोडविण्याची संधी मिळाली. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाच्या परीक्षांमधील यंत्रणा चोख असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात परीक्षा केंद्रावरील घोळ समोर येत असल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.