शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या विशेष ‘टीम’वर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: November 3, 2015 03:28 IST

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठातील तज्ज्ञांची एकदिवसीय

नागपूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठातील तज्ज्ञांची एकदिवसीय राज्यस्तरीय बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २० जणांची ‘टीम’ सहभागी होणार आहे. परंतु या ‘टीम’ची निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनुभवी शिक्षणतज्ज्ञांना अंतर्गत राजकारणातून डावलल्याचा आरोप माजी प्राधिकरण सदस्यांनी केला आहे.ही परिषद ३ नोव्हेंबर रोजी चर्चगेट येथील सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ‘यूजीसी’चे उपाध्यक्ष यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगजगताचे प्रतिनिधी, शिक्षणजगताशी संबंधित सर्व घटकांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. यासाठी इतर विद्यापीठांप्रमाणे नागपूर विद्यापीठानेदेखील २० जणांची ‘टीम’ निवडली. यात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी.के. अग्रवाल यांच्यासह विद्यापीठाचे विविध विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापक, विभागप्रमुखांचा समावेश आहे. परंतु ही निवड करताना कुलगुरूंनी अनुभवी शिक्षणतज्ज्ञांना डावलून एका विशिष्ट गटातील विश्वासू व्यक्तींना यात संधी दिली आहे, असा आरोप करण्यात येत आहे. जर असे नसेल तर कुठल्या निकषांवर ही निवड करण्यात आली, असा प्रश्नदेखील विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे. या ‘टीम’ची निवड तसेच दौरा याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी ही ‘टीम’ दुरंतो एक्स्प्रेसने मुंबईसाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)कुठे चालले नागपूर विद्यापीठ?या प्रकाराबद्दल व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शैक्षणिक धोरणासंदर्भात अनुभवी तज्ज्ञ जास्त सखोल मुद्दे मांडू शकतात. परंतु कुलगुरूंच्या या ‘टीम’मध्ये बहुतांश जणांना फारसा अनुभव नाही. अनेक जण तर विद्यापीठाच्या एकाही प्राधिकरणांचे कधीही सदस्यदेखील राहिलेले नाहीत व त्यांना विद्यापीठ कायद्याचेदेखील ज्ञान नाही. ज्यांनी गेली २० वर्षे विद्यापीठ गाजवले अशा तज्ज्ञांना संधी न देता जवळील लोकांना घेऊन जाणे हा प्रकार अयोग्य आहे. विद्यापीठाच्या पैशाने सहल करण्याचा हा प्रकार असून कुठे चालले नागपूर विद्यापीठ, असा सवाल त्यांनी केला आहे.शैक्षणिक गुणवत्तेला दिले महत्त्वकुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. या परिषदेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणातील प्रस्तावित २० विषयांवर गटश: चर्चा करण्यात येणार आहे. या विषयांत ज्यांचे संशोधन आहे किंवा जे प्रत्यक्ष यातील विषय शिकवितात त्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्राधिकरणांचा अनुभव नसला तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यांची पात्रता लक्षात घेऊनच हे स्थान देण्यात आले, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.