शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

१८,५९७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद व खासगी ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांची निर्मिती करून त्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध शासकीय याेजनांची याेग्य अंमलबजावणी करून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागाचीही निर्मिती केली. मात्र, या विभागातील विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याने केवळ एका अधिकाऱ्याला रामटेक तालुक्यातील शिक्षणाचा डाेलारा सांभाळावा लागत आहे. शासनाच्या या उदासीन धाेरणामुळे तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या एकूण १८,५९७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रामटेक तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम व आदिवासीबहुल आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची व हलाखीची असल्याने त्यांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी शासकीय शाळांवाचून गत्यंतर नाही. त्यामुळे तालुक्यातील १७० शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या १४० शाळांमधून ८,९९३ तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ३९ शाळांमधून ९,६०४ विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. एकूण १२ केंद्रांमध्ये विभागण्यात आलेल्या शाळा विचारात घेता तालुक्यातील शिक्षणाचा व्याप लक्षात येताे.

मध्यंतरी आदर्श शिक्षक निवडीचे प्रस्ताव नागपूर येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला पाठविण्यात आले. त्यात निवड करण्यासाठी जिल्हा निवड समिती असते. यात नियमाप्रमाणे विभागीय चाैकशी असणारे शिक्षक अपात्र ठरतात. पण या चाैकशीचे कागदपत्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे नसतात. त्यामुळे ही जबाबदारी जिल्हा निवड समितीची असते. यालाही गटशिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात असल्याने वादळ निर्माण झाले हाेते.

रामटेक पंचायत समितीमध्ये शिक्षणाच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करून, याेग्य निर्णय घेण्यापेक्षा इतर विषयांची अधिक चर्चा हाेत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांही आक्रमक हाेताना दिसून येत नाही. या प्रकारामुळे एकीकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, दुसरीकडे ग्रामीण भागातील शिक्षकांचा विकास खुंटल्यागत झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त पदे भरणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षण क्षेेत्रातील जाणकार व्यक्तींनी केली अहे.

...

रिक्त पदांचे ग्रहण

रामटेक तालुक्यातील सर्व शाळा १२ केंद्रांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याला १२ केंद्र प्रमुखांची गरज असताना केंद्र प्रमुखांची चार पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर १३ शिक्षकांची कमतरता असून, सात विषय शिक्षकांची तर दाेन मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिवाय, वरिष्ठ लिपिकाचेही पद रिक्त असून, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने या एकट्याच तालुक्याच्या शिक्षणाचा डाेलारा सांभाळत आहेत.

...

पगाराची समस्या ऐरणीवर

तालुक्याच्या ठिकाणापासून करवाही हे गाव ५० किमी आहे. या सर्वांच्या शैक्षणिक विकासासाठी केवळ एक अधिकारी (गटशिक्षणाधिकारी) आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या पगाराचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांचे पगार दर महिन्याच्या १ तारखेला हाेणे अपेक्षित असताना, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पगार बिले तयार करायला विलंब हाेत असल्याने पगारही उशिरा हाेतात.