शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक मुलाचा अधिकार

By admin | Updated: July 10, 2017 01:24 IST

गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. मुलांना हा अधिकार मिळवून देण्यासाठी आईने शक्य तेवढे प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही ...

हायकोर्टाचे मत : कर्तव्य विसरलेल्या वडिलांना दणकाराकेश घानोडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. मुलांना हा अधिकार मिळवून देण्यासाठी आईने शक्य तेवढे प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही असे कर्तव्याचा विसर पडलेल्या वडिलांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.प्रकरणातील दाम्पत्य विभक्त असून त्यांना दोन अल्पवयीन मुले आहेत. आई मुलांच्या शिक्षणासाठी माहेरचे घर सोडून शहरात स्थानांतरित झाली होती. त्यामुळे तिला २५०० रुपये घरभाडे द्यावे लागत होते. दरम्यान, सहाव्या वेतन आयोगामुळे मुलांच्या वडिलांचे वेतन वाढले. त्यांना शेतीतूनही आर्थिक उत्पन्न मिळत होते. या बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाने मुलांना प्रत्येकी तीन हजार तर, त्यांच्या आईला चार हजार रुपये मासिक पोटगी देण्याचा आदेश वडिलांना दिला होता. त्याविरुद्ध वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने वडिलांची कर्तव्यशून्य भूमिका पाहता त्यांचे कान टोचले. आईने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी शहरात स्थलांतरित होण्यात काहीच चूक नाही. वडिलांनी वाऱ्यावर सोडलेल्या मुलांनी दुर्गम भागातव राहावे व चांगले शिक्षण घेऊ नये असे कोणालाही वाटू शकत नाही. दर्जेदार शिक्षण घेणे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. त्यासाठी येणारा खर्च अमान्य केला जाऊ शकत नाही. परिणामी मुलांना व आईला पोटगी वाढवून देण्याचा निर्णय योग्य आहे असे उच्च न्यायालयाने सांगितले.वाढीव पोटगी अवाजवी असल्याचा दावा वडिलांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो दावाही फेटाळून लावला. महागाईचा दर व दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या सतत वाढत असलेल्या किमती लक्षात घेता मंजूर पोटगी योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुरुवातीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने वडिलांनी मुलांना व त्यांच्या आईला वाऱ्यावर सोडल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्यावर वडिलांनी आक्षेप घेतला नाही. परिणामी त्या निरीक्षणाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. ४४ हजार जमा करण्याचा आदेशथकीत पोटगीचे ४४ हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश वडिलांना देण्यात आला आहे. तसेच, आई व मुलांना ही रक्कम उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे.