शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

गुणवत्ता ढासळली, सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST

शरद मिरे भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ...

शरद मिरे

भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ही समस्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजली आहे. त्यातच यावर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून उत्पादन क्षमता खालावली. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यावर्षी खरीपाच्या हंगामात शेतात सोयाबीनचे हिरवे पीक उभे होत असताना रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. उत्पादन क्षमता मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांचे बियाणे शेतात पेरणीपश्चात उगवण क्षमतेत ‘फेल’ ठरले. त्यामुळे खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या. पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

अशात ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबीन आहे, त्यांनी ते बियाणे जतन करून ठेवावे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे, त्यांनी दर तीन महिन्याला घरच्याघरी उगवण क्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व आपल्या स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास येणाऱ्या अडचणीवर मात करता येऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे गावातील शेतकऱ्यांना बाजारभावाने हे बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. ________________________________________

‌‌ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा व एक-दोन एकर शेत रिकामे आहे, त्यांनी ३० जानेवारीपर्यंत कमीतकमी एक एकर शेतात केवळ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करावी. व्यवस्थित देखभाल केल्यास ३ ते ५‌ क्विंटल एकरी उत्पादन येऊ शकते. त्यातून चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होऊ शकते. उन्हाळी सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असल्याने खरीप हंगामामध्ये २२ ते २५ किलो एवढे एकरी सोयाबीन पेरणीकरिता लागेल. यातून उत्पादन खर्चात बचत होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

२००‌ हेक्टर मध्ये बीजोत्पादन

पुढील हंगामात येणारी बियाण्यांची संभाव्य‌ टंचाई लक्षात घेता, तालुका कृषी विभागाने गत ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीन उत्पादक गावात 'ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम' राबविला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीजोत्पादनासाठी कृषी विभागाने तालुक्यात ५०० हेक्टरचे नियोजन केले. त्यापैकी सद्यस्थितीत तालुक्यात २०० हेक्टरमध्ये उन्हाळी लागवड झाली आहे. तर उर्वरित ३०० हेक्टरचे उदिष्टसुद्धा पूर्ण करणार असल्याचा विश्वास तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी व्यक्त केला. यातून बियाण्यांच्या टंचाईवर मात करता येणार आहे.

---

गत खरीपाच्या हंगामातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आतापासूनच सावध होणे आवश्यक आहे. बियाण्यांच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी पुढील हंगामाची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यादरम्यान शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास, कृषी विभाग मार्गदर्शन व सहकार्यासाठी सज्ज आहे.

राजेश जारोंडे,

तालुका कृषी अधिकारी भिवापूर