शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता ढासळली, सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST

शरद मिरे भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ...

शरद मिरे

भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ही समस्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजली आहे. त्यातच यावर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून उत्पादन क्षमता खालावली. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यावर्षी खरीपाच्या हंगामात शेतात सोयाबीनचे हिरवे पीक उभे होत असताना रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. उत्पादन क्षमता मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांचे बियाणे शेतात पेरणीपश्चात उगवण क्षमतेत ‘फेल’ ठरले. त्यामुळे खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या. पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

अशात ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबीन आहे, त्यांनी ते बियाणे जतन करून ठेवावे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे, त्यांनी दर तीन महिन्याला घरच्याघरी उगवण क्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व आपल्या स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास येणाऱ्या अडचणीवर मात करता येऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे गावातील शेतकऱ्यांना बाजारभावाने हे बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. ________________________________________

‌‌ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा व एक-दोन एकर शेत रिकामे आहे, त्यांनी ३० जानेवारीपर्यंत कमीतकमी एक एकर शेतात केवळ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करावी. व्यवस्थित देखभाल केल्यास ३ ते ५‌ क्विंटल एकरी उत्पादन येऊ शकते. त्यातून चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होऊ शकते. उन्हाळी सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असल्याने खरीप हंगामामध्ये २२ ते २५ किलो एवढे एकरी सोयाबीन पेरणीकरिता लागेल. यातून उत्पादन खर्चात बचत होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

२००‌ हेक्टर मध्ये बीजोत्पादन

पुढील हंगामात येणारी बियाण्यांची संभाव्य‌ टंचाई लक्षात घेता, तालुका कृषी विभागाने गत ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीन उत्पादक गावात 'ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम' राबविला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीजोत्पादनासाठी कृषी विभागाने तालुक्यात ५०० हेक्टरचे नियोजन केले. त्यापैकी सद्यस्थितीत तालुक्यात २०० हेक्टरमध्ये उन्हाळी लागवड झाली आहे. तर उर्वरित ३०० हेक्टरचे उदिष्टसुद्धा पूर्ण करणार असल्याचा विश्वास तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी व्यक्त केला. यातून बियाण्यांच्या टंचाईवर मात करता येणार आहे.

---

गत खरीपाच्या हंगामातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आतापासूनच सावध होणे आवश्यक आहे. बियाण्यांच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी पुढील हंगामाची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यादरम्यान शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास, कृषी विभाग मार्गदर्शन व सहकार्यासाठी सज्ज आहे.

राजेश जारोंडे,

तालुका कृषी अधिकारी भिवापूर