शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘एमआरओ’चे दर्जेदार संचालन हे आव्हानच

By admin | Updated: October 19, 2015 03:11 IST

उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे.

दिनेश केसकर : सहा महिन्यांत भारतीय प्रवाशांमध्ये २१ टक्के वाढनागपूर : उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. या ‘एमआरओ’ मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु नागपुरात येण्यासाठी जागतिक पातळीवरील सोडाच परंतु अगदी मुंबईतले लोकदेखील येण्यास तयार नसतात. त्यामुळे याचे दर्जेदार संचालन करणे हे ‘एअर इंडिया’समोर आव्हान राहणार आहे, असे मत ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केले. ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’तर्फे हवाई क्षेत्रातील जागतिक स्थिती आणि बदलते चित्र या विषयावर व्याख्यानाचे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.केसकर बोलत होते.जागतिक स्तरावरील हवाई क्षेत्रात चढउतार होत असतात. परंतु एकूण प्रगती लक्षात घेता येत्या २० वर्षात जगभरात ३८ हजार ५० नवीन विमानांची गरज लागणार आहे. यातील १४ हजार ३३० विमानांची सर्वात जास्त मागणी आशिया खंडातून राहणार आहे. त्या तुलनेत अमेरिका व युरोप मागे राहणार असल्याची माहिती डॉ.केसकर यांनी दिली. जागतिक पातळीवर चित्र लक्षात घेतले तर गेल्या वर्षभरात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली असून ९०० हून अधिक नवीन विमाने सेवेत आली आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष सुरेश जुनघरे, संयोजक अनिल गणात्रा, सचिव डॉ.संजय मानेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. जुनघरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.मानेकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)नागपूरमध्ये ‘नेटवर्क’ वाढावेगेल्या काही वर्षांत नागपूरने हवाई क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला केवळ एकाच कंपनीकडून सेवा देण्यात येत होती. आता अनेक कंपन्यांची विमाने यायला लागली आहे. जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी नागपुरात हवाई सेवेचे ‘नेटवर्क’ वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारतीयांनी ‘मार्केटिंग’ कौशल्य वाढवावेदेशातील हवाई क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाचा ‘जीडीपी’ देखील वाढीस लागला असून या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांतच भारतात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवाई क्षेत्रात वाढ झाली तर हॉटेल, पर्यटन इत्यादी क्षेत्रांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. परंतु समोरील संधी आणि आव्हाने लक्षात घेता भारतीयांनी ‘मार्केटिंग’मधील कौशल्य वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.