शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरओ’चे दर्जेदार संचालन हे आव्हानच

By admin | Updated: October 19, 2015 03:11 IST

उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे.

दिनेश केसकर : सहा महिन्यांत भारतीय प्रवाशांमध्ये २१ टक्के वाढनागपूर : उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. या ‘एमआरओ’ मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु नागपुरात येण्यासाठी जागतिक पातळीवरील सोडाच परंतु अगदी मुंबईतले लोकदेखील येण्यास तयार नसतात. त्यामुळे याचे दर्जेदार संचालन करणे हे ‘एअर इंडिया’समोर आव्हान राहणार आहे, असे मत ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केले. ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’तर्फे हवाई क्षेत्रातील जागतिक स्थिती आणि बदलते चित्र या विषयावर व्याख्यानाचे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.केसकर बोलत होते.जागतिक स्तरावरील हवाई क्षेत्रात चढउतार होत असतात. परंतु एकूण प्रगती लक्षात घेता येत्या २० वर्षात जगभरात ३८ हजार ५० नवीन विमानांची गरज लागणार आहे. यातील १४ हजार ३३० विमानांची सर्वात जास्त मागणी आशिया खंडातून राहणार आहे. त्या तुलनेत अमेरिका व युरोप मागे राहणार असल्याची माहिती डॉ.केसकर यांनी दिली. जागतिक पातळीवर चित्र लक्षात घेतले तर गेल्या वर्षभरात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली असून ९०० हून अधिक नवीन विमाने सेवेत आली आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष सुरेश जुनघरे, संयोजक अनिल गणात्रा, सचिव डॉ.संजय मानेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. जुनघरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.मानेकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)नागपूरमध्ये ‘नेटवर्क’ वाढावेगेल्या काही वर्षांत नागपूरने हवाई क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला केवळ एकाच कंपनीकडून सेवा देण्यात येत होती. आता अनेक कंपन्यांची विमाने यायला लागली आहे. जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी नागपुरात हवाई सेवेचे ‘नेटवर्क’ वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारतीयांनी ‘मार्केटिंग’ कौशल्य वाढवावेदेशातील हवाई क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाचा ‘जीडीपी’ देखील वाढीस लागला असून या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांतच भारतात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवाई क्षेत्रात वाढ झाली तर हॉटेल, पर्यटन इत्यादी क्षेत्रांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. परंतु समोरील संधी आणि आव्हाने लक्षात घेता भारतीयांनी ‘मार्केटिंग’मधील कौशल्य वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.