शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

परीक्षा विभागात गुणवाढीचे ‘रॅकेट’?

By admin | Updated: October 16, 2016 02:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये विविध त्रुटी आढळल्या होत्या.

नागपूर विद्यापीठ : ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे १०० हून अधिक विद्यार्थी ‘रडार’वरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये विविध त्रुटी आढळल्या होत्या. सुधारित गुणपत्रिका मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरला होता. मात्र परीक्षेला गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरल्याची बाब समोर आली आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या १०० हून अधिक असून यामुळे परीक्षा विभागातील अधिकारी हैराण झाले आहे. यामागे गुणवाढीचे कुठले ‘रॅकेट’ तर कार्यरत नाही ना यादृष्टीने प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ झाली आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व इतर माहिती ‘आॅनलाईन’ पाठवावी लागते. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे नोंदणी क्रमांक, विषय व नावे अचूकपणे पाठविले नाही. ‘डाटा मिसमॅच’ झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘वॉन्टिंग’ अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरले.मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. प्रत्येक अर्ज सखोलपणे तपासण्यात आला. सुरुवातीला सर्व काही आलबेल वाटत असतानाच परीक्षेलाच गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरल्याची बाब लक्षात आली. सुरुवातीला याला गंभीरतेने घेण्यात आले नाही. मात्र ही संख्या वाढत गेली व १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी असे अर्ज भरल्याचे आढळले. परीक्षेला गैरहजर असणारे विद्यार्थी एकाचवेळी असे अर्ज भरणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. त्यांना कुठली तरी शाश्वती असल्याशिवाय ते असे पाऊल उचलणार नाहीत. यामागे कुठले ‘रॅकेट’ आहे का यादृष्टीने चौकशी सुरू असल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिली. जर यंदा ‘आॅनलाईन’ प्रणाली नसती तर असे प्रकार समोरच आले नसते. या प्रणालीमुळेच अनेक बाबी समोर येऊ शकतात, असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)सर्व प्रकरणे शिस्तपालन समितीकडेपरीक्षेला गैरहजर असूनदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील आठवड्यात ७३ होती. ती आता शंभराहून अधिक झाली आहे. यातील सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेतीलच आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात आले असून चौकशीसाठी शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशी सुरू, ‘आॅनलाईन’चा फायदापरीक्षेला गैरहजर असूनदेखील एकाच वेळी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरणे ही बाब आश्चर्यजनक आहे. ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे असे विद्यार्थी लक्षात आले. हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही गैरप्रकार आहे, याची चौकशी सुरू आहे. यावर आत्ताच काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. ‘आॅनलाईन’मुळे परीक्षा प्रणाली सक्षम होत असून भविष्यात पूर्ण प्रणाली पारदर्शक होईल. त्यामुळे गैरप्रकारांना थाराच राहणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.