शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परीक्षा विभागात गुणवाढीचे ‘रॅकेट’?

By admin | Updated: October 16, 2016 02:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये विविध त्रुटी आढळल्या होत्या.

नागपूर विद्यापीठ : ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे १०० हून अधिक विद्यार्थी ‘रडार’वरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये विविध त्रुटी आढळल्या होत्या. सुधारित गुणपत्रिका मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरला होता. मात्र परीक्षेला गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरल्याची बाब समोर आली आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या १०० हून अधिक असून यामुळे परीक्षा विभागातील अधिकारी हैराण झाले आहे. यामागे गुणवाढीचे कुठले ‘रॅकेट’ तर कार्यरत नाही ना यादृष्टीने प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ झाली आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व इतर माहिती ‘आॅनलाईन’ पाठवावी लागते. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे नोंदणी क्रमांक, विषय व नावे अचूकपणे पाठविले नाही. ‘डाटा मिसमॅच’ झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘वॉन्टिंग’ अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरले.मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. प्रत्येक अर्ज सखोलपणे तपासण्यात आला. सुरुवातीला सर्व काही आलबेल वाटत असतानाच परीक्षेलाच गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरल्याची बाब लक्षात आली. सुरुवातीला याला गंभीरतेने घेण्यात आले नाही. मात्र ही संख्या वाढत गेली व १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी असे अर्ज भरल्याचे आढळले. परीक्षेला गैरहजर असणारे विद्यार्थी एकाचवेळी असे अर्ज भरणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. त्यांना कुठली तरी शाश्वती असल्याशिवाय ते असे पाऊल उचलणार नाहीत. यामागे कुठले ‘रॅकेट’ आहे का यादृष्टीने चौकशी सुरू असल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिली. जर यंदा ‘आॅनलाईन’ प्रणाली नसती तर असे प्रकार समोरच आले नसते. या प्रणालीमुळेच अनेक बाबी समोर येऊ शकतात, असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)सर्व प्रकरणे शिस्तपालन समितीकडेपरीक्षेला गैरहजर असूनदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील आठवड्यात ७३ होती. ती आता शंभराहून अधिक झाली आहे. यातील सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेतीलच आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात आले असून चौकशीसाठी शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशी सुरू, ‘आॅनलाईन’चा फायदापरीक्षेला गैरहजर असूनदेखील एकाच वेळी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरणे ही बाब आश्चर्यजनक आहे. ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे असे विद्यार्थी लक्षात आले. हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही गैरप्रकार आहे, याची चौकशी सुरू आहे. यावर आत्ताच काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. ‘आॅनलाईन’मुळे परीक्षा प्रणाली सक्षम होत असून भविष्यात पूर्ण प्रणाली पारदर्शक होईल. त्यामुळे गैरप्रकारांना थाराच राहणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.