शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

नळ योजनांना सोलर पंप लावा

By admin | Updated: June 5, 2016 02:48 IST

तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या एकूण ३८ नळ योजना कार्यान्वित असूप, सहा गावांमध्ये नळ योजना नाही.

चंद्रशेखर बावनकुळे : जवळीच्या समाधान शिबिरात ८५०० प्रमाणपत्रांचे वाटपभिवापूर : तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या एकूण ३८ नळ योजना कार्यान्वित असूप, सहा गावांमध्ये नळ योजना नाही. यापुढे सर्व गावांमधील नळ योजनांना सोलर पंप लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भिवापूर तालुक्यातील जवळी येथे शनिवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या शिबिरात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या एकूण ८५०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून, ६७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आ. सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी भगत, आनंद राऊत, नंदा नारनवरे, दीपाली इंगोले, योगिता चिमूरकर उपस्थित होते.यावेळी परिसरातील २२ गावांमधील सरपंच व उपसरपंचांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरुस्ती, पांदण रस्ते, वीज दुरुस्ती, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी इमारत, स्मशानघाट यासह अन्य समस्या मांडल्या. महावितरणच्या पायाभूत आराखडा - २ च्या कामांचा आढावाही घेण्यात आला. या सर्व समस्या तीन महिन्यांत सोडवाव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांनी केलेली काम सादर केली. त्यात २५ रस्त्यांचे सिमेंटीकरण व ४६ रस्त्यांची कामे पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याचे काम आॅक्टोंबर - २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जलसंधारणाच्या कामावर जिल्हा नियोजन समितीतर्फे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, कालव्यांचे पुनरुज्जीवन, पाणीपुरवठा योजना या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात सोलर पंप लावावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले असून, यासाठी लागणारा ५० टक्के निधी शासन देणार असून, ५० टक्के खर्च शेतकऱ्याने करावयाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. सोलर पंपामुळे नळ योजना व शेतकऱ्यांनी विजेच्या बिलातून मुक्तता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) सावकारी कर्ज माफकारगाव जिल्हा परिषद सर्कलमधील ७१२ कर्जदार शेतकऱ्यांना १ कोटी ५४ लाख रुपयांच्या सावकारी कर्जातून मुक्तता मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यातील ६५ शेतकऱ्यांच्या सावकारांकडे तारण असलेल्या वस्तू परत देण्यात आल्या. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेचा लाभ १९ लाभार्थांना मिळाला असून, या योजनेतून ३ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचा लाभ २१७ कुटुंबांना मिळाल्याचे सांगण्यात आले. मोखाबर्डी उपसा सिंचन योजनातालुक्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेवर मार्च २०१६ पर्यंत १०७३.९८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यंदासाठी या प्रकल्पाला ३६७ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. या योजनेच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून झाले नाही. ते वेगाने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.