शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या हस्तक्षेपामुळे सामाजिक सलोख्याला धक्का

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय

तारिक अन्वर : सरकारची चुकीच्या दिशेने वाटचालनागपूर : देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप वाढल्याने देशातील सामाजिक सलोख्याला धक्का पोहचल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी शनिवारी केला. पत्रकार भवनात आयोजित वार्तालाप कार्यक्र मात ते बोलत होते.अटल बिहारी वाजपेयी भाजपचे पंतप्रधान होते परंतु त्यांनी वादग्रस्त मुद्यांना बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. हे देशासाठी घातक आहे,, असे मत अन्वर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मते मिळाली तर विरोधात ६९ टक्के मते पडली. असे असतानाही भाजपच्या २८८ जागा निवडून आल्या. मुस्लीम समाजाच्या लोकांनी भाजपला मते दिली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मतदान केले. काही दिवसातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. याचा परिणाम नुक त्याच पार पडलेल्या काही राज्यातील पोटनिवडणुकीत दिसून आला. लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष विचाराचे नेते एकत्र आल्याचे अन्वर म्हणाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, राजू नागूलवार, रमेश फुले, पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.मोदींचे विरोधीमुक्त धोरणसरकारइतकेच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाही. एकूण जागांच्या १० टक्के निवडून आल्या तरच विरोधी पक्षनेतेपद देता येईल, असे घटनेत कुठेही नमूद नाही. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सरकारला निर्देश दिलेले आहे. परंतु मोदींना विरोधीमुक्त, विरोधमुक्त सरकार चालवायचे असल्याचे अन्वर म्हणाले.(प्रतिनिधी)