शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोराडी औष्णिक केंद्राच्या हिश्श्याचे शुद्ध पाणी रोज सोडावे लागते नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:54 IST

Koradi thermal power plant, Pure water, nagpur news कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नवे प्रकरण उजेडात आले आहे. करारानुसार मनपा वीज केंद्रासाठी दररोज पाणी शुद्ध करते. मात्र केंद्राकडून तेवढे पाणी उचलले जात नसल्याने शुद्ध केलेले १९० मिलियन लिटर पाणी रोज नदीत सोडावे लागत आहे. हा प्रकार जून महिन्यापासून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नवे प्रकरण उजेडात आले आहे. करारानुसार मनपा वीज केंद्रासाठी दररोज पाणी शुद्ध करते. मात्र केंद्राकडून तेवढे पाणी उचलले जात नसल्याने शुद्ध केलेले १९० मिलियन लिटर पाणी रोज नदीत सोडावे लागत आहे. हा प्रकार जून महिन्यापासून सुरू आहे.

कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी पेंच प्रकल्पातून ६७ दलघमी पाणी आरक्षित आहे. प्रकल्प तयार होतानाच असा करार झाला आहे. हे पाणी महानगरपालिकेने शुद्ध करून औष्णिक केंद्राला द्यावे, असा महाजनकोसोबत करारही आहे. मात्र अलीकडे महाजनको अन्य स्रोतांच्या माध्यामातून पाणी उचलत आहे. सोबतच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे वीजनिर्मितीसाठी पूर्वीसारखे जास्त पाणी लागत नाही. यामुळे वीज केंद्राची पाण्याची मागणी हळूहळू कमी होत असल्याने पाणी पूर्णत: उचलले जात नाही.

असे असले तरी महाजनकोसोबत झालेल्या करारनुसार पेंचमधून उचलले जाणारे पाणी मनपा रोज शुद्ध करते. ६७ दलघमी पाणी आरक्षित असल्याने तेवढे शुद्ध केले जाते. परंतु केंद्राकडून फक्त ४७ दलघमी पाणी वापरले जात असल्याने उर्वारित शुद्ध पाणी दररोज अशुद्ध पाण्यासोबत नदीत सोडावे लागत आहे. मागील जून महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे.

जून महिन्यापासूनचे बिल वादात

करारानुसार रोज पूर्ण पाणी देण्याची मनपाची तयारी आहे. मात्र केंद्राकडून त्याची उचल होत नाही. आम्ही पाणी द्यायला तयार आहेत, मात्र केंद्र ते उचलत नाही, असे मनपाचे म्हणणे आहे. जून महिन्यापासून केंद्राने पाणी वापर कमी केला असला तरी मनपा त्यांच्यासाठी पूर्ण पाणी शुद्ध करीत आहे. त्यामुळे मनपाने पाण्याचे बिल महाजनकोकडे पाठविले. मात्र आम्ही पाणी तेवढे वापरत नसल्याने बिल पूर्ण पाण्याचे का द्यावे, असा मुद्दा महाजनकोचा आहे.

पेंच पाणी बंद करणार?

हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. शेतकऱ्यांच्या वापराचे पाणी केंद्राला देण्यासाठी मनपा उचलत आहे. मात्र ते केंद्र उचलत नसल्याने शुद्ध पाणी नदीत सोडावे लागत आहे. यात पेंच प्रकल्पाचा तोटा होत आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचे बिल कुणी द्यावे, हा सुद्धा नवा पेच या प्रसंगामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रासाठी आरक्षित असलेले पाणी मनपाला देणे बंद करण्याचा निर्णय भविष्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येत असल्याने यावर ते काय निर्णय घेतात, हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी