शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

१,८५१ शेतकऱ्यांचा धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र राज्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यात केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून एकूण सात खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १,८५१ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला आहे, परंतु अद्यापही २,२४४ शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शिल्लक आहे. धान खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्चअसून, उर्वरित १३ दिवसांत २,२४४ शेतकऱ्यांकडील धान खरेदी करणे आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन यांच्यापुढे आव्हानच आहे. अशा परिस्थितीत धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे एकूण सहा खरेदी केंद्र असून, या केंद्रांतर्गत १३० गावे जोडली आहेत. तालुक्यातील भोंदेवाडा (डोंगरी), हिवराबाजार, भंडारबोडी (महादुला), पवनी देवलापार (बांद्रा) व टुयापार येथे ही खरेदी केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत या केंद्रांवर ८५८ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रामटेक तालुका शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या खरेदी केंद्रावर १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला गेला. रामटेकच्या एका खरेदी केंद्रावर १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जातो, तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण सहा खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केवळ ८५८ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जातो. यात आदिवासी विकास महामंडळाची अनास्था असल्याचे धान उत्पादक शेतकऱ्यांत बाेलले जात आहे.

अत्यंत ढिसाळ व कासवगतीने महामंडळांच्या सहा केंद्रांवर खरेदी केली जात असून, हा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, या केंद्रांवर शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईल की नाही, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. महामंडळांच्या सहा खरेदी केंद्रांची गती पाहता, आपला धान खरेदी केला जाणार नाही, या भीतीने अनेकांनी आपले सातबारा घेऊन नव्याने रामटेक तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था यांच्याकडे नोंदणी केली आहे. या ठिकाणी आतापावेताे ३,२३७ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदी-विक्री संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला असून, येत्या ३१ मार्चपर्यंत उर्वरित २,०५१ शेतकऱ्यांचा धान खरेदी करणे बाकी आहे. केवळ १३ दिवसांत एवढ्या शेतकऱ्यांचा धान खरेदी करणे अशक्य आहे. अशा स्थितीत शासनाने ठरल्याप्रमाणे ३१ मार्चला धान खरेदी बंद केल्यास शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाने खरेदीसाठी मुदतवाढ देणे क्रमप्राप्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत रामटेकचे सहायक निबंधक रवींद्र वसू यांना विचारणा केली असता, सध्यातरी खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत असून, शक्य तितक्या शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुदतवाढ मिळेल किंवा नाही व सर्व नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईलच, याची हमी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना संपर्क केला असता, संपर्क हाेऊ शकला नाही.