शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पूरण मेश्राम नवे कुलसचिव

By admin | Updated: May 23, 2015 02:36 IST

सत्तासंघर्षाच्या कुलगीतुऱ्यात गुरुवारी परीक्षा नियंत्रकाची निवड थांबली.

नागपूर विद्यापीठ : राजकारण दूर सारत एकमताने झाली निवडंनागपूर : सत्तासंघर्षाच्या कुलगीतुऱ्यात गुरुवारी परीक्षा नियंत्रकाची निवड थांबली. कुलसचिवपदी ए. पी. जोशी की ए. डी. जोशी ? असा एक्झिट पोल असताना विद्यापीठाची नाडी ओळखणारे विद्यमान वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम यांची विद्यापीठाचे नवे कुलसचिव म्हणून निवड समितीने एकमताने निवड केली. परीक्षा नियंत्रकाची निवड करताना विद्यापीठातील राजकीय पारा ४७ अंशाच्यावर होता. शुक्रवारी कुलसचिवपदासाठी झालेल्या मुलाखतीत दुपारपर्यंत सत्तासंघर्ष असला तरी ‘ कुल मार्इंड’ लावत गुणवत्तेच्या आधारावर मेश्राम यांची कुलसचिवपदी निवड करण्यात यावी, असे मत सत्तापक्षातील निवड समितीच्या सदस्यांनी मांडले. गुरुवारी झालेल्या परीक्षा नियंत्रक निवडीत सत्तापक्ष आणि उर्वरित निवड समिती सदस्यांत मतभेद झाल्यामुळे ‘टायब्रेकर’ झाला व परत फेरप्रक्रिया राबविण्याची वेळ आली. विद्यापीठात सुपर पॉवर असलेल्या कुलसचिव पदासाठी १३ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु यातील १२ उमेदवारच प्रत्यक्ष उपस्थित राहिले. प्रत्येक उमेदवाराने निवड समितीसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण दिले व त्यानंतर मुलाखती झाल्या. याच्या आधारावर निवड समितीने सर्वोत्तम २ उमेदवार निवडले. यात डॉ.पूरण मेश्राम व विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.श्यामसुंदर भोगा यांचा समावेश होता. निवड समितीचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. सर्व सदस्यांनी डॉ.मेश्राम यांच्या नावालाच अनुमोदन दिले व एकमताने त्यांची निवड झाली. सोमवारी ते पदभार स्वीकारतील.विद्यापीठाच्या विकासावर भरनागपूर विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकडून अपेक्षा फार वाढल्या आहेत. विद्यापीठाचा दर्जा आणखी वाढावा यासाठी प्रशासनाची मोठी भूमिका राहणार आहे. विशेषत: नव्या आव्हानांचा सामना करत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विकासात्मक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यापीठात बरीच वर्षे काम केल्यामुळे येथील बलस्थाने व कमकुवत दुवे यांची माहिती आहे. पूर्ण भर हा विद्यापीठाच्या विकासावरच असेल.- पूरण मेश्राम, नवनियुक्त कुलसचिव राजकारणाला महत्त्व नाहीविद्यापीठात अंतर्गत राजकारण असले तरी महत्त्वाच्या पदांच्या निवडीत उमेदवाराची क्षमता, अनुभव यांना महत्त्व देण्यात येते. सर्वांचे सादरीकरण झाल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उमेदवारांची नावे काढण्यात आली व डॉ.पूरण मेश्राम यांचे नाव समोर आले. विद्यापीठात राजकारण नव्हे ‘मेरिट’ला महत्त्व आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.