शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कामठी तालुक्यात दंडात्मक कारवाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिकांनी उपाय याेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिकांनी उपाय याेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम ही कामठी तहसील प्रशासनाने सुरू केली आहे. ही माेहीम जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.

दिवाळीनंतर काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात झाल्याने शासनाने नागरिकांना उपाय याेजनांचे पालन करण्याचे आवाहन करीत काही प्रमाणात सूट दिली हाेती. प्रशासनाने कानाडाेळा करताच नागरिकांनी मनसाेक्त फिरायला, गर्दी करायला तसेच धुमधडाक्यात लग्नसमारंभ करायला मागे बघितले नाही. त्यातच मागील आठवड्यापासून नागपूर शहरासह जिल्ह्यात काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये तहसीलदार अरविंद हिंगे यांनी नुकतीच कामठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष सभा बाेलावली हाेती. या सभेला खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे, विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्ण साबळे, ग्रामविकास अधिकारी राजू फरकाडे, सपना गावंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व प्रमुख कर्मचारी उपस्थित हाेते. या सभेत उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देेश तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिले.

...

पाहणीसाठी पथकांची निर्मिती

ठाणेदारद्वय विजय मालचे व संजय मेंढे यांच्या नेतृत्वात पथकांची निर्मिती करण्यात आली असून, ही पथके कामठी शहरातील शुक्रवारी बाजार, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रनाळा परिसरातील तसेच कामठी-नागपूर मार्गावरील मॉल, लॉन, मंगल कार्यालय, सभागृह यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन काेराेना प्रतिबंधक उपाय याेजनांची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. उपाय याेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही अरविंद हिंगे यांनी स्पष्ट केले.

...

दंडाचे स्वरूप

घराबाहेर पडताना नियमित मास्क न वापरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड ठाेठावला व वसूल केला जाईल. लग्न समारंभात ५० नागरिकांपेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्याचे निदर्शनास येताच संबंधित लाॅन, मंगल कार्यालय व सभागृह मालकांवर सार्वजनिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७० नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सांगितले.