शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अजनीवनाच्या झाडांसाठी महापालिकेला जनसुनावणी अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे ...

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे परिपत्रक महापालिकेला प्राप्तही झाले आहे. असे असताना महापालिका काेणत्या अधिकाराने अजनीच्या झाडांसाठी जनसुनावणी घेत आहे, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

एनएचएआयच्या इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अजनीवन भागातील ४९३० झाडे ताेडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने त्या झाडांवर नाेटीस लावून ती ताेडण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मनपाने त्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत मनपाकडे झाडे ताेडण्याविराेधात ४५०० पेक्षा अधिक आक्षेप नाेंदविण्यात आले आहेत. यानुसार ३० जूनला जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

मात्र राज्य शासनाने वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणानुसार एखाद्या प्रकल्पासाठी २०० च्यावर झाडे ताेडायची असतील तर ते प्रकरण राज्य वृक्ष प्राधिकरणाद्वारे सुनावणीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ५० पेक्षा अधिक वयाच्या झाडांना हेरिटेज वृक्षाचा दर्जा देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात परिपत्रक पाठवून सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कायद्यानुसार महापालिकेद्वारे घेण्यात येणारी जनसुनावणी अवैध ठरणारी असल्याचा आराेप अजनीवन वाचवा लढ्याचे प्रतिनिधी जाेसेफ जाॅर्ज यांनी केला आहे. राज्य शासनाचा कायदा त्वरित लागू करणे महापालिकेसाठी बंधनकारक आहे आणि प्रस्तावित सुनावणी रद्द करणे व झाडांवर लागलेले नाेटीस काढणे क्रमप्राप्त असल्याचे जाॅर्ज यांनी सांगितले.

मात्र उद्यान विभागाने सुनावणी निरस्त केली नाही व नाेटीसही काढले नाहीत. यावरून महापालिका एकप्रकारे दादागिरी करीत असल्याचा आराेप जाॅर्ज यांनी केला. यावरून महापालिका राजकीय दबावापाेटी आणि काही लाभासाठी स्वत:च सुनावणीचे घाेडे दामटत असल्याची टीका त्यांनी केली. महापालिकेने झाडांवरील नाेटीस काढून सुनावणी रद्द केली नाही तर राज्य शासनाच्या नव्या वृक्ष संवर्धन कायद्यानुसार मनपाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध पाेलिसांत गुन्हा दाखर करणार असल्याचा इशारा जाॅर्ज यांनी लाेकमतशी बाेलताना दिला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी व पर्यावरणवाद्यांमध्ये पुन्हा वाद पेटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.