शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अजनीवनाच्या झाडांसाठी महापालिकेला जनसुनावणी अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे ...

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे परिपत्रक महापालिकेला प्राप्तही झाले आहे. असे असताना महापालिका काेणत्या अधिकाराने अजनीच्या झाडांसाठी जनसुनावणी घेत आहे, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

एनएचएआयच्या इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अजनीवन भागातील ४९३० झाडे ताेडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने त्या झाडांवर नाेटीस लावून ती ताेडण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मनपाने त्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत मनपाकडे झाडे ताेडण्याविराेधात ४५०० पेक्षा अधिक आक्षेप नाेंदविण्यात आले आहेत. यानुसार ३० जूनला जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

मात्र राज्य शासनाने वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणानुसार एखाद्या प्रकल्पासाठी २०० च्यावर झाडे ताेडायची असतील तर ते प्रकरण राज्य वृक्ष प्राधिकरणाद्वारे सुनावणीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ५० पेक्षा अधिक वयाच्या झाडांना हेरिटेज वृक्षाचा दर्जा देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात परिपत्रक पाठवून सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कायद्यानुसार महापालिकेद्वारे घेण्यात येणारी जनसुनावणी अवैध ठरणारी असल्याचा आराेप अजनीवन वाचवा लढ्याचे प्रतिनिधी जाेसेफ जाॅर्ज यांनी केला आहे. राज्य शासनाचा कायदा त्वरित लागू करणे महापालिकेसाठी बंधनकारक आहे आणि प्रस्तावित सुनावणी रद्द करणे व झाडांवर लागलेले नाेटीस काढणे क्रमप्राप्त असल्याचे जाॅर्ज यांनी सांगितले.

मात्र उद्यान विभागाने सुनावणी निरस्त केली नाही व नाेटीसही काढले नाहीत. यावरून महापालिका एकप्रकारे दादागिरी करीत असल्याचा आराेप जाॅर्ज यांनी केला. यावरून महापालिका राजकीय दबावापाेटी आणि काही लाभासाठी स्वत:च सुनावणीचे घाेडे दामटत असल्याची टीका त्यांनी केली. महापालिकेने झाडांवरील नाेटीस काढून सुनावणी रद्द केली नाही तर राज्य शासनाच्या नव्या वृक्ष संवर्धन कायद्यानुसार मनपाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध पाेलिसांत गुन्हा दाखर करणार असल्याचा इशारा जाॅर्ज यांनी लाेकमतशी बाेलताना दिला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी व पर्यावरणवाद्यांमध्ये पुन्हा वाद पेटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.