शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
2
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
3
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
4
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
6
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
7
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
8
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
9
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
10
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
11
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
12
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
13
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
14
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
15
कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
16
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
17
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
18
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
19
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
20
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
Daily Top 2Weekly Top 5

अजनीवनाच्या झाडांसाठी महापालिकेला जनसुनावणी अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे ...

नागपूर : वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार अजनीवनाचे प्रकरण आता राज्य शासनाच्या अखत्यारित गेले आहे. हे परिपत्रक महापालिकेला प्राप्तही झाले आहे. असे असताना महापालिका काेणत्या अधिकाराने अजनीच्या झाडांसाठी जनसुनावणी घेत आहे, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

एनएचएआयच्या इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अजनीवन भागातील ४९३० झाडे ताेडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने त्या झाडांवर नाेटीस लावून ती ताेडण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मनपाने त्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत मनपाकडे झाडे ताेडण्याविराेधात ४५०० पेक्षा अधिक आक्षेप नाेंदविण्यात आले आहेत. यानुसार ३० जूनला जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

मात्र राज्य शासनाने वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणानुसार एखाद्या प्रकल्पासाठी २०० च्यावर झाडे ताेडायची असतील तर ते प्रकरण राज्य वृक्ष प्राधिकरणाद्वारे सुनावणीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ५० पेक्षा अधिक वयाच्या झाडांना हेरिटेज वृक्षाचा दर्जा देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात परिपत्रक पाठवून सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कायद्यानुसार महापालिकेद्वारे घेण्यात येणारी जनसुनावणी अवैध ठरणारी असल्याचा आराेप अजनीवन वाचवा लढ्याचे प्रतिनिधी जाेसेफ जाॅर्ज यांनी केला आहे. राज्य शासनाचा कायदा त्वरित लागू करणे महापालिकेसाठी बंधनकारक आहे आणि प्रस्तावित सुनावणी रद्द करणे व झाडांवर लागलेले नाेटीस काढणे क्रमप्राप्त असल्याचे जाॅर्ज यांनी सांगितले.

मात्र उद्यान विभागाने सुनावणी निरस्त केली नाही व नाेटीसही काढले नाहीत. यावरून महापालिका एकप्रकारे दादागिरी करीत असल्याचा आराेप जाॅर्ज यांनी केला. यावरून महापालिका राजकीय दबावापाेटी आणि काही लाभासाठी स्वत:च सुनावणीचे घाेडे दामटत असल्याची टीका त्यांनी केली. महापालिकेने झाडांवरील नाेटीस काढून सुनावणी रद्द केली नाही तर राज्य शासनाच्या नव्या वृक्ष संवर्धन कायद्यानुसार मनपाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध पाेलिसांत गुन्हा दाखर करणार असल्याचा इशारा जाॅर्ज यांनी लाेकमतशी बाेलताना दिला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी व पर्यावरणवाद्यांमध्ये पुन्हा वाद पेटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.