शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

पीएसआय पदभरतीत ‘ओबीसी’ला डावलले

By admin | Updated: February 26, 2017 03:06 IST

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील ७५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदभरतीसाठी जारी केलेल्या

हायकोर्टात आव्हान : एमपीएससीला नोटीस नागपूर: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील ७५० पोलीस उपनिरीक्षकांच्या पदभरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीत इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) डावलण्यात आले आहे. या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० पैकी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे एमपीएससीच्या या जाहिरातीला थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देऊन एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांच्या समोर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रतिवादी एमपीएससी आणि गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून एक आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा जाहिरातीला स्थगिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीने या पदभरतीसाठी मागील डिसेंबर २०१६ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्या जाहिरातीत ओबीसी प्रवर्गासाठी एकही पद राखीव ठेवलेले नाही, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम हरीशचंद्र धोटे यांनी हायकोर्टात धाव घेऊन ही याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांच्या मते, एमपीएससीच्या २००१ च्या कायद्यानुसार पदभरतीत ओबीसी प्रवर्गासाठी एकूण जागांच्या १९ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र डिसेंबरमध्ये जारी झालेल्या जाहिरातीत ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही. त्याचवेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके व विमुक्त प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वी २०१० ते २०१५ दरम्यान एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या पदभरतीत ओबीसी प्रवर्गासाठी १९ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पदभरती प्रक्रियेतही ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ७५० जागांच्या १९ टक्के म्हणजे, १४२ जागा राखीव ठेवणे अपेक्षित होते. परंतु एमपीएससीने या प्रवर्गाला जाणीवपूर्वक डावलले आहे. हा एकप्रकारे ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय असून, मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा याचिकेतून उल्लेख केला आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ एस. ओ. अहमद यांनी युक्तिवाद केला, तर सहायक सरकारी वकिल निवेदिता मेहता यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. (प्रतिनिधी)