शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

सहा हजार बंधाऱ्यासाठी ६०० कोटींची तरतूद

By admin | Updated: January 30, 2015 00:48 IST

सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे.

तलाव दुरूस्तीसाठी योजना : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची पत्रपरिषदभंडारा : सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून राज्यभरात सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, असे सांगून सहा हजार नवीन बंधाऱ्यासाठी ६०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पासह काही उपसा सिंचन योजनेची पाहणी केल्याचे सांगून ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या नवीन मागण्या पूर्ण केल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गोसीखुर्द धरणानजीक जलविद्युत प्रकल्पाचे काम संथगतीने असले, तरी कामाची गती वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अत्यल्प दराने वीज उपलब्ध होऊ शकेल. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात सातही तालुक्यांना भेटी देऊन तालुकानिहाय कामाचा आढावा घेतला असता अनेक समस्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. मागील आघाडी शासनाच्या काळात मनमानी पद्धतीने कामाचे वाटप करण्यात आले होते. याची सखोल चौकशी सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलाव व इतर लघु योजनांच्या दुरूस्तीसाठी तत्कालीन सरकारने निधी दिला नाही. मात्र युती शासन या तलावाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी धडक मोहीम राबविणार आहे. आमदार-खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून निधी देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याचे अनुकूल निकाल हाती येतील आणि राज्यभरातील सुमारे १३.५ लाख हेक्टर एकरात सिंचन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, जिल्हा उपप्रमुख प्रशांत लांजेवार, सुनील कुरंजेकर व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)