शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

गरिबांना सुलभ व स्वस्त आरोग्यसेवा मिळावी

By admin | Updated: January 21, 2016 02:40 IST

आरोग्यसेवा संदर्भात कायदे अस्तित्वात आहेत. यांचा उपयोग झाला तर विधायक गोष्टी होऊ शकतात, हे अलीकडे दिसून आले आहे.

न्या.भूषण गवई : विधी महाविद्यालयात ‘जस्टा कॉजा’चे उद्घाटननागपूर : आरोग्यसेवा संदर्भात कायदे अस्तित्वात आहेत. यांचा उपयोग झाला तर विधायक गोष्टी होऊ शकतात, हे अलीकडे दिसून आले आहे. आरोग्यसेवा महाग झाली आहे, ही बाब खरी आहे. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. गरिबांना सुलभ व स्वस्त आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील ‘जस्टा कॉजा’ या विधी महोत्सवाचे बुधवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.विधी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कराड येथील ‘कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’चे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव पुरण मेश्राम, प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार प्रामुख्याने उपस्थित होते. न्या.गवई यांनी न्यायादानाच्या वेळी आरोग्याबाबत येणाऱ्या अनेक याचिकेबाबत माहिती दिली. आरोग्यक्षेत्राशी संबंधित अनेक कायद्यांमुळे बऱ्याच नकारात्मक बाबींवर वचक आला आहे. परंतु आरोग्यसेवा महाग झाल्या असून त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे व त्यादृष्टीने प्रयत्न वाढले पाहिजेत, असे न्या.गवई म्हणाले. नागरिकांना आरोग्याचा अधिकार मिळावा यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कायदे करण्यात आले आहे. परंतु या कायद्यांबाबत फारशी जागृती मात्र झालेली नाही. जर देशातील आरोग्यसेवा सक्षम करायची असेल तर संबंधित कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. देशातील ८० टक्के आरोग्यसेवा खासगी संस्थांचा हाती आहेत. त्यावर केवळ २० टक्के जनता अवलंबून आहे. परंतु उरलेल्या २० टक्के शासकीय आरोग्यसेवेवर देशातील ८० टक्के जनता अवलंबून आहे. त्यामुळे हव्या तशा आरोग्यसेवा मिळू शकत नाही. उपचार घेण्यासाठीदेखील नागरिकांना कर्ज काढावे लागते. ही स्थिती बदलण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.मिश्रा म्हणाले. कुलगुरू डॉ.काणे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कोमावार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.मृण्मयी कुकडे व गौरी पुरोहित यांनी संचालन केले तर डॉ. विभा महाजनी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)