शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बालकांचे संरक्षण वाऱ्यावर

By admin | Updated: June 29, 2015 02:54 IST

बालकांचे अपराधिक प्रकरण दिवसेंदिवस वाढत असताना बालकांना संरक्षण देणारी केंद्र सरकारपुरस्कृत योजना राज्यात लुळी पडली आहे.

बालसंरक्षण कक्षाची दुरवस्था : महिला व बालकल्याण विभागाचे दुर्लक्ष नागपूर : बालकांचे अपराधिक प्रकरण दिवसेंदिवस वाढत असताना बालकांना संरक्षण देणारी केंद्र सरकारपुरस्कृत योजना राज्यात लुळी पडली आहे. या योजनेसाठी कें द्र सरकारकडून उपलब्ध झालेला निधी मंत्रालयस्तरावरील भोंगळ कारभारामुळे उपलब्धच झालेला नसल्याने संपूर्ण राज्यात योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. बालकांच्या हितासाठी राज्य सरकारने २०१२-१३ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष स्थापन केले. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून बालहिताच्या योजना या कक्षाद्वारे राबविण्यात येणार होत्या. यात बालकांसाठी कार्य करणाऱ्या सर्व विभागाशी समन्वय साधणे, बालकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देणे, बालकांच्या समस्या सोडविणे, एकात्मिक बालसंरक्षण योजना राबविणे आदी कार्य या कक्षाचे आहे. मात्र लिखित स्वरूपात कामाची कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे बालसंरक्षण कक्षाचे कर्मचारी अनभिज्ञ आहेत. नियमानुसार प्रत्येक कक्षासाठी १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात चार ते पाच कर्मचाऱ्यांवरच कक्षाची जबाबदारी आहे. खुद्द महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात या कक्षाचा कारभार केवळ तीन कर्मचाऱ्यांवर आहे. बालन्याय अधिनियमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी, बालमजुरी थांबविण्यासाठी, भरकटलेल्या बालकांवर संस्कार करण्यासाठी, बालकांवर होत असलेले अन्याय थांबविण्यासाठी, बेपत्ता झालेल्या बालकांची सविस्तर माहिती विविध विभागांना पुरविण्याचे काम बालसंरक्षण कक्षाला करायचे आहे. मात्र या कक्षाला स्वत:चे कार्यालय नाही. कार्यालयात फर्निचर आहे, मात्र तेही तुटलेले. कार्यालयात संगणक नाही, दूरध्वनी नाही. नागपूरच्या कार्यालयाचे काम एका स्वयंपाकखोलीत सुरू आहे. प्रशासनाने या योजनेला उभीच होऊ दिली नाही. महिला व बालकल्याण विभागाने लक्षच दिले नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून बालसंरक्षण कक्ष मूलभूत सोयींपासून वंचित आहे. (प्रतिनिधी)