शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रॉपर्टी डीलरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:56 IST

अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देभूखंडाच्या सौद्यात गमावला जीव : अतिक्रमण करणाºयांनी घेतला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडामुळे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड थरार निर्माण झाला होता. सोनू शाहू आणि कल्लू यादव अशी आरोपींची नावे आहेत.सतीश जयराम वाघमारे यांचा रिंगरोडला लागून कामगारनगर चौकाजवळ २७०० चौरस फुटांचा भूखंड आहे.या भूखंडावर अतिक्रमण करून आरोपी सोनू शाहू आणि कालू यादव १५ वर्षांपासून पान आणि चहा टपरी चालवित होते. हा मोक्याचा भूखंड आपलाच आहे, अशा अविर्भावात ते वागत होते. वाघमारे यांनी तो भूखंड विकायला काढला होता. राजेश नंदेश्वर आणि सागर राऊत हे दोघे मित्र प्लॉट, फ्लॅट विक्रीचे आणि नासुप्रमध्ये मालमत्तेसंदर्भात अडले नडले कामे करून देण्याचेच काम करायचे. वाघमारेच्या भूखंडाचा त्यांनी शेख अब्दुल हक ऊर्फ पापाभाई यांच्यासोबत २७ लाखात सौदा पक्का केला होता. मात्र, अतिक्रमण हटविल्यानंतरच कमिशनची रक्कम मिळेल, अशी अट भूखंड विकणारे आणि विकत घेणाºयांनी टाकली होती. त्यामुळे राजेशने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला माहिती देऊन अतिक्रमण हटविण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक वाघमारेंच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचे काम करणार होते.कुटुंबीयांवर आघातप्रॉपर्टी डिलींगमध्ये भागीदार असलेला सागर हा दुपारी १ वाजतापासून राजेशला फोन करीत होता. मात्र, इकडे मारेकºयांनी त्याचा घात केल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर जरीपटका पोलीस तेथे पोहचले. त्यांनी राजेशचा फोन वाजत असल्याचे पाहून उचलला नंतर सागरला त्याच्या मित्राच्या हत्येची धक्कादायक माहिती कळाली. एवढेच नव्हे तर पोलिसांना मृत कोण आहे, कुठे राहतो, त्याची माहिती कळली. मृत राजेशला तीन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. पत्नीला हे वृत्त कळताच ती किंचाळतच घटनास्थळी धावली. त्याचे दोन लहानगे घरीच खेळत होते. आपले पितृछत्र हिरावले गेल्याची कसलीही कल्पना या निरागस जीवांना नव्हती. ऐन दिवसाळीच्या तोंडावर कटुुंबप्रमुख गेल्यामुळे नंदेश्वर कुटुंबीयांच्या भविष्यात काळोख पेरल्यासारखा झाला आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ ते १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाची माहिती जरीपटका पोलिसांकडून पत्रकार तर सोडा पोलिसांच्या माहिती कक्षालाही रात्री ९.१५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. मृत किंवा आरोपींची नावे, घटनास्थळ, कारण, घटनेची वेळ अशी जुजबी माहितीही उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.आरोपींचे साथीदार किती ?राजेशच्या हत्येचे कटकारस्थान आरोपींनी आधीच करून ठेवले असल्याचा संशय आहे. त्यांनी आपल्या टपरीत तलवार लपवून ठेवली होती, त्यातून हे स्पष्ट होते. अनेकांदेखत राजेशची हत्या केल्यानंतर आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले. त्यासाठी दोन दुचाक्या तयार होत्या. ऐन चौकाजवळ असलेला हा भूखंड प्रत्यक्षात ७० लाख ते १ कोटी रुपये किंमतीचा आहे. तो हातून जात असल्याचे पाहून आरोपींनी कट करूनच हे हत्याकांड घडविले असल्याच्या संशयाला बळकटी येते. या एकूणच प्रकारामुळे आरोपींसोबत आणखी काही साथीदार राजेशच्या हत्येच्या कटात सहभागी असावे, असाही संशय घेतला जात आहे. रात्रीपर्यंत या प्रकरणातील कोणताही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

घाई गडबडीमुळे झाला घातपोलीस बंदोबस्तात शासकीय यंत्रणा अतिक्रमण हटविणार हे माहीत असूनही राजेशला घाई झाली होती. त्यामुळे अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच सोनू आणि कल्लूने त्यांचे अतिक्रमण हटवावे, असे त्याला वाटत होते. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी राजेश आणि त्याचा मित्र सागर हे दोघे भूखंडावर गेले होते. तेथे त्यांनी सोनू आणि कल्लूला भूखंड विक्रीची कल्पना देऊन तातडीने आपले अतिक्रमण हटविण्याविषयी सांगितले होते. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास राजेश पुन्हा एकटाच सोनू आणि कल्लूच्या टपरीवर गेला. तुम्ही तातडीने आपले दुकान हटवा, आता काही वेळेतच अतिक्रमण हटाव पथक येणार आहे, असे त्याने सांगितले. त्यावरून सोनू आणि कल्लूने राजेशसोबत वाद घातला.