शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

प्रॉपर्टी डीलरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:56 IST

अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देभूखंडाच्या सौद्यात गमावला जीव : अतिक्रमण करणाºयांनी घेतला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडामुळे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड थरार निर्माण झाला होता. सोनू शाहू आणि कल्लू यादव अशी आरोपींची नावे आहेत.सतीश जयराम वाघमारे यांचा रिंगरोडला लागून कामगारनगर चौकाजवळ २७०० चौरस फुटांचा भूखंड आहे.या भूखंडावर अतिक्रमण करून आरोपी सोनू शाहू आणि कालू यादव १५ वर्षांपासून पान आणि चहा टपरी चालवित होते. हा मोक्याचा भूखंड आपलाच आहे, अशा अविर्भावात ते वागत होते. वाघमारे यांनी तो भूखंड विकायला काढला होता. राजेश नंदेश्वर आणि सागर राऊत हे दोघे मित्र प्लॉट, फ्लॅट विक्रीचे आणि नासुप्रमध्ये मालमत्तेसंदर्भात अडले नडले कामे करून देण्याचेच काम करायचे. वाघमारेच्या भूखंडाचा त्यांनी शेख अब्दुल हक ऊर्फ पापाभाई यांच्यासोबत २७ लाखात सौदा पक्का केला होता. मात्र, अतिक्रमण हटविल्यानंतरच कमिशनची रक्कम मिळेल, अशी अट भूखंड विकणारे आणि विकत घेणाºयांनी टाकली होती. त्यामुळे राजेशने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला माहिती देऊन अतिक्रमण हटविण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक वाघमारेंच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचे काम करणार होते.कुटुंबीयांवर आघातप्रॉपर्टी डिलींगमध्ये भागीदार असलेला सागर हा दुपारी १ वाजतापासून राजेशला फोन करीत होता. मात्र, इकडे मारेकºयांनी त्याचा घात केल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर जरीपटका पोलीस तेथे पोहचले. त्यांनी राजेशचा फोन वाजत असल्याचे पाहून उचलला नंतर सागरला त्याच्या मित्राच्या हत्येची धक्कादायक माहिती कळाली. एवढेच नव्हे तर पोलिसांना मृत कोण आहे, कुठे राहतो, त्याची माहिती कळली. मृत राजेशला तीन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. पत्नीला हे वृत्त कळताच ती किंचाळतच घटनास्थळी धावली. त्याचे दोन लहानगे घरीच खेळत होते. आपले पितृछत्र हिरावले गेल्याची कसलीही कल्पना या निरागस जीवांना नव्हती. ऐन दिवसाळीच्या तोंडावर कटुुंबप्रमुख गेल्यामुळे नंदेश्वर कुटुंबीयांच्या भविष्यात काळोख पेरल्यासारखा झाला आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ ते १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाची माहिती जरीपटका पोलिसांकडून पत्रकार तर सोडा पोलिसांच्या माहिती कक्षालाही रात्री ९.१५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. मृत किंवा आरोपींची नावे, घटनास्थळ, कारण, घटनेची वेळ अशी जुजबी माहितीही उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.आरोपींचे साथीदार किती ?राजेशच्या हत्येचे कटकारस्थान आरोपींनी आधीच करून ठेवले असल्याचा संशय आहे. त्यांनी आपल्या टपरीत तलवार लपवून ठेवली होती, त्यातून हे स्पष्ट होते. अनेकांदेखत राजेशची हत्या केल्यानंतर आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले. त्यासाठी दोन दुचाक्या तयार होत्या. ऐन चौकाजवळ असलेला हा भूखंड प्रत्यक्षात ७० लाख ते १ कोटी रुपये किंमतीचा आहे. तो हातून जात असल्याचे पाहून आरोपींनी कट करूनच हे हत्याकांड घडविले असल्याच्या संशयाला बळकटी येते. या एकूणच प्रकारामुळे आरोपींसोबत आणखी काही साथीदार राजेशच्या हत्येच्या कटात सहभागी असावे, असाही संशय घेतला जात आहे. रात्रीपर्यंत या प्रकरणातील कोणताही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

घाई गडबडीमुळे झाला घातपोलीस बंदोबस्तात शासकीय यंत्रणा अतिक्रमण हटविणार हे माहीत असूनही राजेशला घाई झाली होती. त्यामुळे अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच सोनू आणि कल्लूने त्यांचे अतिक्रमण हटवावे, असे त्याला वाटत होते. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी राजेश आणि त्याचा मित्र सागर हे दोघे भूखंडावर गेले होते. तेथे त्यांनी सोनू आणि कल्लूला भूखंड विक्रीची कल्पना देऊन तातडीने आपले अतिक्रमण हटविण्याविषयी सांगितले होते. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास राजेश पुन्हा एकटाच सोनू आणि कल्लूच्या टपरीवर गेला. तुम्ही तातडीने आपले दुकान हटवा, आता काही वेळेतच अतिक्रमण हटाव पथक येणार आहे, असे त्याने सांगितले. त्यावरून सोनू आणि कल्लूने राजेशसोबत वाद घातला.