शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

खापरीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - खापरी गावातील गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तयार करून ते राज्य शासनाच्या अर्थखात्याकडे तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - खापरी गावातील गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तयार करून ते राज्य शासनाच्या अर्थखात्याकडे तातडीने पाठविण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. यासंदर्भात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या प्रधान सचिव वलसा नायर व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्याशी चर्चादेखील केली.

बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला प्रामुख्याने उपस्थित होते. खापरी गावठाणाच्या अंतिम निवाड्याचा ५५ कोटींचा प्रस्ताव तयार असून यापैकी ३२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुधारित निवाडा घोषित करण्यासाठी २३ कोटी रुपये अधिक लागणार आहेत. त्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे गडकरींनी सांगितले.

खापरी गावठाणा व बाहेरील घरे सेवावस्तीतील नागरिकांना प्लॉटचे वितरण लवकर करण्यात यावे अशा सूचनाही याप्रसंगी देण्यात आल्या. खापरीची जमीन ही महागडी असून व्यावसायिक दृष्टीने या जमिनीचा विकास केला पाहिजे. तसेच पुनर्वसनातील घरकुलांसाठी निविदा काढून चांगल्या पध्दतीने बांधकाम व नागरी सुविधा नागरिकांना मिहानने उपलब्ध करून द्याव्या. एमएडीसीने भूखंड पात्र प्रकल्पग्रस्तांना वितरण करण्याचे अधिकार राखून ठेवले असल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली.

मिहान प्रकल्पांतर्गत १२.५ टक्के विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे ७० रुपये चौ. फूट हे विकास शुल्क भरण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची तयारी नसून चांगल्या नागरी सुविधांसाठी हा दर अत्यंत कमी आहे. उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पुनर्वसनातील लोकांनी नागरी सुविधांच्या कामांची तपासणी करून भूखंडांचा ताबा घ्यावा, असे देखील गडकरी यांनी सांगितले.

तीन महिन्यात एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या

दरम्यान, मौद्याच्या एनटीपीसी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्याने घ्या व या प्रकरणी सविस्तर अभ्यास करून येत्या ३ महिन्यात प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे प्रकरण निकालात काढा,असे निर्देश गडकरी यांनी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसंदर्भात गडकरींच्या निवासस्थानीच बैठक घेण्यात आली. एनटीपीसी फक्त आयटीआय प्रशिक्षितांसाठीच जाहिरात काढते. ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आहे, त्यांना नोकरीसाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. गेल्या १० वर्षात सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही, हे गंभीर आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अधिकाराचे हनन करता येणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. एनटीपीसी प्रकल्पातील फ्लाय ॲश स्थानिक व लहान व्यावसायिकांना देण्यात यावी, अशी सूचनादेखील गडकरी यांनी केली.