शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

एलईडीच्या विरोधात अपप्रचार

By admin | Updated: March 23, 2015 02:13 IST

एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे,

नागपूर : एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काही लोकं या विरोधात अपप्रचार करीत आहे, अशी टीका केंद्रीय ऊर्जा व कोळसा खाण राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत एलईडी दिवे लावण्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता व दिवे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात गोयल यांना विचारले असता त्यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही लोक या विरोधात अपप्रचार करीत आहेत. कदाचित त्यांची रुची ही खासगी क्षेत्रात असावी, असे गोयल म्हणाले.केंद्रीय योजनेनुसारच जुने पथदिवे बदलून त्याजागी एलईडी लावण्याचा निर्णय झाला. या दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होते. त्यामुळे पुढील तीन वर्षात शासकीय कार्यालये आणि घराघरातसुद्धा एलईडी लावण्यास मान्यता दिली आहे. यामुळे १० हजार मे.वॅ.विजेची मागणी कमी होईल व देशात १२ ते १५ हजार कोटींची बचत होईल. एकट्या मुंबईत ८० कोटी रुपये यामुळे वाचतील व त्यासाठी महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. मागणी वाढल्याने एलईडीच्या किंमतीही कमी होत असून खरेदीची प्रक्रियाही पारदर्शकतेनेच पूर्ण केली जात आहे, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. रद्द झालेल्या कोळसा खाण पट्टे वाटपाच्या संदर्भात न्यायालयाने संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. दंड न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुधारित पद्धतीने झालेल्या कोळसा खाणपट्याच्या लिलावातून सरकारला महसूल अधिक मिळणार असला तरी त्यामुळे विजेचे दर वाढणार नाही. कारण लिलाव करतानाच यासंदर्भात अट घालण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. कोळशाच्या दर्जावरून राज्यात वेकोलि आणि महाजन्को यांच्यातील सर्व वाद संपुष्टात आले असून आता नवीन सुरुवात झाली आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे लक्षच दिले नव्हते, असे गोयल म्हणाले.(प्रतिनिधी)