शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

एलईडीच्या विरोधात अपप्रचार

By admin | Updated: March 23, 2015 02:13 IST

एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे,

नागपूर : एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काही लोकं या विरोधात अपप्रचार करीत आहे, अशी टीका केंद्रीय ऊर्जा व कोळसा खाण राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत एलईडी दिवे लावण्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता व दिवे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात गोयल यांना विचारले असता त्यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही लोक या विरोधात अपप्रचार करीत आहेत. कदाचित त्यांची रुची ही खासगी क्षेत्रात असावी, असे गोयल म्हणाले.केंद्रीय योजनेनुसारच जुने पथदिवे बदलून त्याजागी एलईडी लावण्याचा निर्णय झाला. या दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होते. त्यामुळे पुढील तीन वर्षात शासकीय कार्यालये आणि घराघरातसुद्धा एलईडी लावण्यास मान्यता दिली आहे. यामुळे १० हजार मे.वॅ.विजेची मागणी कमी होईल व देशात १२ ते १५ हजार कोटींची बचत होईल. एकट्या मुंबईत ८० कोटी रुपये यामुळे वाचतील व त्यासाठी महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. मागणी वाढल्याने एलईडीच्या किंमतीही कमी होत असून खरेदीची प्रक्रियाही पारदर्शकतेनेच पूर्ण केली जात आहे, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. रद्द झालेल्या कोळसा खाण पट्टे वाटपाच्या संदर्भात न्यायालयाने संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. दंड न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुधारित पद्धतीने झालेल्या कोळसा खाणपट्याच्या लिलावातून सरकारला महसूल अधिक मिळणार असला तरी त्यामुळे विजेचे दर वाढणार नाही. कारण लिलाव करतानाच यासंदर्भात अट घालण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. कोळशाच्या दर्जावरून राज्यात वेकोलि आणि महाजन्को यांच्यातील सर्व वाद संपुष्टात आले असून आता नवीन सुरुवात झाली आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे लक्षच दिले नव्हते, असे गोयल म्हणाले.(प्रतिनिधी)