शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ओळखीचे पुरावे, तरीही मृतदेह बेवारस !

By admin | Updated: July 11, 2015 02:57 IST

संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा...

नागपूर : संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा गुरुवारी उघडकीस आला.या घटनेमुळे मृत तरुणाचे कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. स्वत:ची चूक लक्षात येताच अजनी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राहुल देवेश खंडागळे (२५) रा. हावरापेठ असे पुरण्यात आलेल्या मृताचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ सुरेंद्र आणि मिलिंद आहेत. वडील छिंदवाडा येथील गावात राहतात. दोघेही भाऊ वाहन चालक आहेत तर आई मोलकरीण आहे. राहुल नेहमी बाहेरगावी टूरवर राहत असल्याने त्याचे घरी येणे-जाणे कमीच होते. ११ जून रोजी रात्री राहुल घरी आला. काही वेळ थांबला आणि नवीन कपडे घालून रात्री १०.३० वाजता रवाना झाला. त्याने मोठा भाऊ सुरेंद्र याला सांगितले होते की, तो टूरवर जात आहे. राहुलजवळ मोबाईल होता. परंतु सिम कार्ड नसल्याने सुरेंद्रने त्याला सिमकार्ड विकत घेऊन फोन करण्यास सांगितले. राहुल घरून निघाला आणि शताब्दीनगर चौकातील आॅटो स्टॅँडवर गेला. सुरेंद्रने त्याला जाताना पाहिले. यानंतर रात्री ११.५० वाजता मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी अजनी पोलिसांना रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ च्या समोरील भिंतीवरून पडून एक तरुण जखमी झाल्याची सूचना दिली. तो तरुण राहुलच होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आकस्मिक विभागात भरती केले. तिचे त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांना राहुलच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आणि मोबाईल सापडला. परंतु अजनी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना शोधण्यास गंभीरता दाखविली नाही. पोलिसांनी बेवारस मृतदेहाला तीन दिवस ठेवण्याची आवश्यकता तेवढी पूर्ण केली. त्यानंतर गंगाबाई घाटावर नेऊन मृतदेह पुरला. यादरम्यान राहुल टूरवर असल्याचे समजून त्याच्या कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. बेवारस मृतदेहाच्या कुटुंबीयांना एक महिन्यानंतरही शोधता आले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजनी पोलिसांना फटकारले तेव्हा कुठे अजनी पोलीस कामाला लागले. ७ जुलै रोजी राहुलच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारावर पोलीस द्वारकापुरी येथे पोहोचले. तेथील एका पानटपरी चालकाने राहुलची ओळख पटविली आणि तो हावरापेठ येथे राहत असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. पोलिसांनी जेव्हा राहुल महिनाभरापूर्वीच मरण पावला असून त्याला दफन करण्यात आल्याचे सांगितले तेव्हा कुटुंबीयांना धक्काच बसला. या घटनेमुळे अजनी पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. यासंदर्भात अजनी पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी राहुलचा मृतदेह आढळल्यावर त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या पत्त्यावर जाऊन विचारपूस केली होती. परंतु तेव्हा कुणीही माहिती दिली नाही. एटीएम कार्डाच्या आधारे शोध घेतला तर तो मध्यप्रदेशातील असल्याचे आढळून आले. सिमकार्ड नसल्याने राहुलचा मोबाईल काम करीत नव्हता. परंतु द्वारकापुरी येथील नागरिकांनी मात्र अजनी पोलिसांच्या दाव्याला खोटे ठरविले आहे. अजनी पोलीस कुठल्याही मृतदेहाबाबत विचारपूस करण्यास आले नव्हते, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. ७ जुलै रोजी पहिल्यांदाच पोलीस विचारपूस करण्यास आले. राहुलचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून येथे राहतात. त्यांना बहुतेक लोकं ओळखतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी अगोदरच विचारपूस केली असती तर १२ जून रोजीच त्याची ओळख पटली असती. (प्रतिनिधी)